अमृतमोहस्तवी वर्षात देश जात असताना आजही शेतकऱ्यांना आत्मदहन करावे लागते. कृषिप्रधान देशात या सारखी कोणतीच गंभीर बाब नाही. 75 व्या स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा संपल्यानंतर जळगाव येथील एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या परिसरात आत्मदहणाचा प्रयन्त केला. तर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे जमीन हडपल्या प्रकरणी 7 जणांनी व तुळजापूर येथे मुलीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी आत्मदहणाचा प्रयत्न केला.
जळगाव येथील सुनील गुजर हे शेतकरी आहेत. सोयाबीन व मक्याच्या व्यवहारात अडचणी येत असल्याने त्यांनी आज आत्मदहणाचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याचे घर ही गहाण आहे. यामुळेच त्यांनी आत्मदहणाचा मार्ग अवलंबला असल्याचे समजते. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून आज 74 वर्षे पूर्ण झालीत. आता 75 व्या अमृत मोहतस्तवी वर्षात पदार्पण करत असताना देशातील शेतकऱ्यांना आशा प्रकारे स्वतःचे जीवन संपवावे लागत आहे. ही खरोखरच विचार करण्याची गोष्ट आहे. कृषिप्रधान देशातच शेतकऱ्यांना स्वतःचे राहते घर गहाण ठेवावे लागते या सारखे दुर्देव नाही. आपल्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांना आत्मदहना सारख्या टोकाच्या पर्यायाचा अवलंब करावा लागतो. ही नक्कीच खेदाची बाब आहे. या प्रकारांनंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
सातारा जिल्ह्यात ही 7 जणांचा आत्मदहणाचा प्रयत्न
कोरेगाव तालुक्यातील आसरे येथे जमीन बाळकावल्या प्रकरणी आज स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यलयासमोर 7 जणांनी आत्मदहणाचा प्रयत्न केला. 2018 साली गावतील एका प्रतिष्टीत व्यक्तीने ही जमीन हडपली आहे. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आत्मदहन कर्त्यांनी केला. या साथ ही आत्मदहन कर्त्याना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तुळजापुरात ही आत्मदहणाचा प्रयन्त
तुळजापूरच्या वेताळनगर परिसरात राहणाऱ्या 18 वर्षीय प्रतीक्षा पुनकेर यांचा उपचारा दरम्यान डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केलेत. तुळजापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रतिक्षा याना उपचारासाठी 4 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले. मात्र 8 फेब्रुवारी 2020 रोजी पहाटे अचानक सोलापूर येथे हलवण्यास सांगितले. मात्र दुर्दैवाने प्रतीक्षा हिचा त्याचदिवशी मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉक्टरवर वारंवार तक्रारी देऊन कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होत नसल्याने मुलीच्या आई वडिलांनी आत्मदहणाचा मार्ग स्वीकारला. प्रकाश पुणेकर व संजीवनी पुणेकर यांनी आज स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN









































