
गेल्या 2 वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शाळांचे दरवाजे बंद झाले होते. ते उघडण्यास राज्य सरकारने अनुकूलता दाखवत 17 ऑगस्ट पासूण शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र बुधवारी सायंकाळी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा अध्यादेश स्थगित करण्यात आला आहे. यामुळे पुढील आदेश येईपर्यंत आता शाळा सुरू होणार नाहीत.

शालेय शिक्षण विभागाने 2 दिवसापूर्वी शाळा सुरू करण्यास अनुकूलता दाखवली होती. या संदर्भात शासन परिपत्रक ही जारी करण्यात आले होते. मात्र बुधवारी झालेल्या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची गरज असल्याचे मत काही मंत्र्यांनी व्यक्त केले होते. तसेच गेले वर्षभर राज्य सरकारने लहान मुलांच्या बाबतीत काळजी घेऊन शाळा बंद ठेवल्या होत्या मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून रुग्ण संख्या ही आटोक्यात आली आहे. यामुळे राज्य सरकारने काही वर्ग सुरू करण्याचा विचार करून तसे परिपत्रक ही जाहीर केले होते. यावेळी मात्र टास्क फोर्स व पीडियाट्रिक टास्क फोर्स यांनी सर्वानीच शाळा व कॉलेज सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. कारण दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अद्यापही लसीकरण झालेल नाही. इतर राज्यातील परीस्थिती पाहता टास्क फोर्स ने ही भीती व्यक्त करत शाळा कॉलेज सुरू करण्याला विरोध दर्शविला आहे.

याच अनुषंगाने आज सांयकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या बैठकीमध्येच शाळा कॉलेज सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असून जो काही निर्णय होईल तो आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळीच स्पष्ट होईल. मात्र तोपर्यंत तरी 17 ऑगस्ट रोजी शाळा सुरू होणार नाही हे निश्चित.
*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN