उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काल पासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे नद्याना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर धुळे – औरंगाबाद – सोलापूर महामार्गावरील कन्नड घाट दरड कोसळून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा मार्ग सध्या वाहतुकीस बंद झाला असून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडी येथे दुचाकीच्याआडवा कुत्रा आल्याने अपघात झाला. या अपघातात रघु भंगरवाला हा परप्रांतीय दुचाकीवरून पडून जखमी झाला. त्याला मनसे च्या विशाल कापडी आणी त्यांच्या सहकाऱ्यांनी 108 रुग्णवाहिकेतून कलंबनी रुग्णालयातउपचारासाठीदाखल केले.
परप्रांतीय फेरीवाल्यांनी मुबई ठाणे महानगर पालिकेच्या माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर 30 ऑगस्ट रोजी कासारवडवली येथे फेरी वाल्याने चाकु हल्ला केला होता. यामध्ये त्यांच्या हाताची दोन बोटे तुटून पडल्याची घटना घडली. आशा प्रकारे अनधिकृत पणे धंदा करणाऱ्या फेरीवल्याने एक महिला अधिकाऱ्यावर हल्ला करण्याची कदाचित महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. त्या फेरी वाल्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो बाहेर आला की महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला मारणार असे वक्तव्य मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले.
राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंदिरे उघडा यासाठी 30 ऑगस्ट रोजी शंखनाद आंदोलनकरण्यात आले. मात्र रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी मंदिरात जाऊन 30 ऑगस्ट रोजी सपत्नीक पूजा केली. त्यांच्या या पूजेने राष्ट्रवादीच्या जि. प. अध्यक्षानेचमहाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे.
कोविड-19 मुळे संपूर्ण राज्यात निर्बंध आहेत. कोरोनाची दुसरी लाट संपत असतानाच राज्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र देव अजूनही देवळातच बंद आहेत. ठाकरे सरकारने अजूनही मंदिर उघडण्यास परवानगी दिली नसल्याने 30 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीने संपूर्ण राज्यात शंखनाद आंदोलन केले होते. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात महाविकास आघाडीच्याच जिल्हा परिषद अध्यक्षांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे.रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी खेड तालुक्यातील काडवली जवळील कुंभवली गावात जाऊन वाघजाई देवीच्या मंदिरात सपत्नीक पूजा केली. याचा विडिओ खेड तालुक्यात सर्वत्र फिरत आहे. यामुळे सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांना वेगळा न्याय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच कोविड-19 चे नियम फक्त सर्वसामान्यांनाच लागू आहेत की राजकीय लोक प्रतिनिधींना ही हे पाहणे कौतुकाचे ठरणार आहे. अशा प्रकारे राज्य सरकारचा आदेश डावलून मंदिरात जाऊन पूजा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद अध्यक्षवर पक्षातर्गत व प्रशासनाकडून कारवाई होणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी नव्या स्वरूपातील संगणकीकृत सातबाराचे लोकार्पण महसूल मंत्र्यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले. यावेळी पहिल्या डिजिटल सातबऱ्या पेक्षा वेगळ्या स्वरूपातील सातबारा पुणे येथून महसूल विभागाने प्रसारित केला होता. आता त्याच नव्या स्वरूपातील सातबऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची सुरवात 2 ऑक्टोबर पासून करण्याचा निर्णय झाला असून या बाबतची घोषणा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीकेली.
दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर मनसे ठाम असून ठाण्यात मनसेने त्यासाठी स्टेज उभारण्याचे काम सुरू केले.मात्र पोलिसांनी हे काम बंद पाडले. यामुळे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यां सह स्टेजवरचउपोषणालासुरवात केली. कार्यक्रमाला परवानगी नसताना स्टेज उभारणी केल्या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. राज्यात राजकीय कार्यक्रमांना गर्दी चालतेमग हिंदू सण साजरे करायला बंदी का? असा प्रश्न अविनाश जाधव यांनी उपस्थित केला. नौपाडा येथील भगवती मैदानावर मनसेने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी त्या ठिकाणी स्टेज बांधण्याचे काम सुरू होते. यावेळी पोलिसांनी त्या स्टेजचे काम थांबवण्यास सांगितले. यामुळे मनसे कार्यकर्त्यानी स्टेजवरच आंदोलन सुरू केले. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी घटनास्थळी जाऊन अविनाश जाधव यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांनीयावेळी जोरदार घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार हा रॉकेट हल्ला काबुल एअर पोर्ट जवळील ख्वाजा बुग्रा परिसरातील एक घरावर झाला असून यामध्ये 2 जण ठार तर 3 जण जखमी झाले आहेत. रविवारी सकाळीच अमेरिकेने आंतकीहल्ल्याची शक्यता वर्तवली होती. त्यांनी ज्या गेट जवळ हल्ला होण्याची शक्यता वर्तवली होती त्याच विमान तळाच्या उत्तरेकडील गेटजवळ हा अतेरिकी हल्ला झालाआहे.या आंतकीहल्ल्यानंतरत्या ठिकाणचा विडिओ खास टाइम्स मराठी न्युज च्या वाचकांसाठी.
केन्द्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबत केकेल्या आक्षेपार्ह वक्तवयामुळे समुर्ण महाराष्ट्रात गदारोळ निर्माण झाला होता. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांची राणेंच्या अटके संदर्भातील क्लिप प्रसारमाध्यमा मध्ये वायरल झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याना सक्त वसुली संचनालयाची म्हणजे ईडी ची नोटीस जारी केली आहे. ही ईडीची मोठी करवाई असल्याचे बोलले जात आहे. त्यातच राणेंची अटक यामुळे या कारवाईची त्यांना पुसटशी कल्पना असल्याचे संजय राऊत यांच्या ट्विट वरून समोर येत आहे. येत्या मंगळवारी 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अनिल परब यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. यावर खासदार संजय राऊत यांनी जन आशीर्वाद यात्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे ईडीची नोटीस बजावण्यात आली असूनवरचे सरकारकामालालागले आहे.अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असून राणेंचे अटकसत्र ही रत्नागिरी जिल्ह्यात झाले होते. त्यामुळे या भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरी असल्याचे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.
धारावीतील शाहू नगर येथे मुबारक हॉटेलच्या बाजूला असणाऱ्या कमला नगर येथील घरात रविवारी दुपारी 12.28 च्या सुमारास गॅस सिलेंडरच्या स्फोट झाला. या स्फोटात 15 जण होरपळ्याची घटना घडली. या स्फोटात 10 जणांना किरोकळ भाजले असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील गंभीर जखमी 50 ते 60 टक्के होरपळ्याची घटना घडली. या स्फोटानंतर पसरलेल्या आगीत शेजरील घरातील 15 जण जखमी झाले. या घटनेची महिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन फायर फायटर आणि एका जेटीच्या साह्याने ही आग विझवली. या दुर्घटनेत जखमी झालेल्याना अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. या घटनेची महिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व रुग्णालयात जाऊन जखमींची पाहणी केली.
या दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे – 1) राजकुमार जैस्वाल (45) 2) अबिना बीबी शेख (27) 3) गुलफान अली (29) 4) अलिना अन्सारी (5) 5) मोहम्मद अब्दुल्ला (21) 6) अस्मा बानो (18) 7) फिरोज अहमद (35) 8) फैय्याज अन्सारी (16) 9) प्रमोद यादव (37) 10) अत्ताजाम अन्सारी (4)
गंभीर जखमी – 11) सतारादेवी जैस्वाल (वय 40) 12) शौकत अली (वय 58) 13) सोनू जैस्वाल (वय 08) 14) अंजून गौतम (वय 28) 15) प्रेम जैस्वाल (वय 32) हे सर्वजण गंभीर जखमी झाले असून ते 50 ते 60 टक्के भजल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात रत्नागिरी भिवंडी बसची डंपरधडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात एस टी बस डंपर धडकली. या अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते बुऱ्हाण टांके, मनसेचे विशाल कापडी, राजन खेडेकर, राकेश जंगम यांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातग्रस्तांना मदत केली.
भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करत एस टी वाहकाची व्यथा उघड केली आहे. यामध्ये अनियमित तुटपुंजा पगारापेक्षा जीव देने बरे असे म्हटले आहे. हा एस टी बसचा वाहक रत्नागिरी जिल्ह्यातील खेड स्थानकातील असल्याचे या ट्विट मधून समोरयेत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील धुळे साक्री येथील एस टी कर्मचाऱ्याने कमी पगार आणि अनियमित वेतनामुळे आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विट मुळे सर्वत्र खळबळ उडाली. या ट्विट मध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड स्थानकच्या एस टी कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली आहे. यामध्ये त्या चालकाने एस टीत लागून 8 वर्षे झाली असून 15000 रुपये पगार असल्याचे नमूद केले आहे. पण शहरात राहून या अनियमित व तुटपुंज्या पगारात प्रपंच कसा चालवायचा असा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला आहे. गेल्या तीन वर्षापासून पगारवाढ नाही, बोलले तर लगेच निलंबन केले जाते. काम सोडून गावी जाऊन करायचे काय शेती वाडी पण नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. लग्नाला 5 वर्षे झाली साधी बायकोला साडी पण घेऊ शकत नाही, लाज वाटते त्या पेक्षा मरण बरे… अशा अशयाचा मेसेज त्यांनी ट्विट केला आहे. हा मेसेज त्यांच्या पर्यँत कसा पोहचला हे स्पष्ट झाले नसले तरी यामधून सदर वाहकाचे नाव हे प्रकाश असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी एस टी कर्मचाऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पडल्याचा गुन्हा मंत्र्यांवर दाखल करा अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट द्वारे केली आहे.
सध्या कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी गणेशोत्सवात त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे. त्यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आले आहेत. त्या मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे –
1. मागील अनुभव लक्षात घेता गणेशोत्सव व त्यानंतर येणा-या सण/ कार्यक्रमानंतर कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊ नये म्हणून कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने त्रिसूत्री घालून दिली आहे. योग्यप्रकारे मास्क वापरणे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे सामाजिक अंतर ठेवणे आणि हात वारंवार धुवून स्वच्छता राखणे या बाढीचे काटेकोर पालन करण्यात यावे. 2 गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्हयामध्ये इतर जिल्हयातून येणा-या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले असतील त्यांना कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. तथापि ज्या प्रवाशांनी अथवा व्यक्तींनी लसीचे दोन डोस पूर्ण केले नसतील अशा व्यक्तीची जिल्हयात प्रवेश करताना कोरोना चाचणी करण्यात येईल. चाचणीमध्ये ज्या व्यक्ती कोरोना बाधित आढळतील त्यांना संस्थात्मक विलगीकरणात रहाणे बंधनकारक असेल. 3. रत्नागिरी जिल्हयामध्ये प्रवेश करण्यापूर्वी 72 तास आधी RTPCR चाचणी केलेली असल्यास प्रवेशाचे वेळी त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे. 4. रत्नागिरी जिल्हयामध्ये येणा-या आणि जिल्हयातून बाहेर जाणा-या प्रवाशांसाठी 1 सप्टेंबर पासून राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करणार आहेत. तथापि प्रवास करताना एसटी/ रेल्वे मध्ये प्रवाशांनी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे व त्याची जबाबदारी वाहक व चालक यांची असेल. 5. गणेशोत्सवासाठी जिल्हयात येणा-या वाहनांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी स्वागत केंद्र म्हणून मंडप उभारणेत येतील. जेणेकरुन वाहन चालकाला थोडीशी विश्रांती मिळू शकेल. त्याचबरोबर प्रवाशांना आरोग्य विषयक मदत/सुविधाही सदर स्वागत कंदात उपलब्ध होऊ शकेल. 6. जिल्हयातील महामार्गावरून गणेशभक्ताचा प्रवास व वाहतुक सुरळीतपणे सुरु रहाण्यासाठी वाहतुक नियंत्रक पोलीस यांनाही आवश्यक त्या सूचना देण्यांत आल्या असून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम तांतडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत. 7. गणेशोत्सव कालावधीत अपघात टाळण्याच्या दृष्टीने रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याबाबतचे दिवस निश्चित करण्यात येतील. 8 महामार्गावर आरोग्य यंत्रणेसह रुग्णवाहीका व इतर यंत्र सामग्री सज्ज ठेवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आलेल्या आहेत. 9. गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणपती बसविण्यात येऊ नयेत असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तथापि, सार्वजनिक गणपती बसविल्यास तो दिड दिवसाचा असावा, असे आवाहन करण्यात येत आहे व त्या ठिकाणी कमीत कमी लोकांची उपस्थिती ठेवणे व कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित मंडळावर राहील. 10. श्रीगणेश आगमन व विसर्जन यावेळी मिरवणूक काढण्यात येऊ नये. 11. गणेशोत्सव काळात आरती/ भजन किर्तन/ जाखडी या सारख्या कार्यक्रमांना गदी करण्यात येऊ नये. हे कार्यक्रम कौटुंबिक स्तरावरच करावे. 12 शासनाने नेमून दिलेल्या मानकाप्रमाणे गणेशमूर्ती असावी 13. गणेशत्सवामध्ये सजावट/ आरास करताना शासनाने प्रतिबंधीत केलेले प्लॅस्टीका थर्माकोल याचा वापर टाळून नैसर्गिक वस्तूपासून आकर्षक आरास करावी. मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा शक्यतो वापर करू नये व अशा मूर्तीचे विसर्जन घरगुती स्वरुपात करावे. 14, 15. श्रीगणेशाचा प्रसाद देणे टाळावे अथवा सुका मेवा/ सुके पदार्थ पूर्ण फळ याचा प्रसाद दयावा. मिठाईमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी आवश्यकत ते नियोजन करणेबाबत अन्न व औषध प्रशासनाला सूचना देण्यांत आलेल्या आहेत. 16 17. गणेशोत्सव काळात ध्वनीप्रदूषण कटाक्षाने टाळावे. गणेशोत्सवामध्ये दर्शन, भजन, किर्तन, जाखडी इत्यादी कार्यक्रमांसाठी नातेवाईक/ मित्रमंडळी यांचे घरी जाणे-येणे टाळावे. 18. गणेशमूर्ती विसर्जन घराच्या आवारात करावे. घरच्या घरी गणेश विसर्जन करणे शक्य नसेल तर कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या तलाव / हौद यामध्ये गदी न करता करावे. 19. स्थानिक प्रशासनाने गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद तलाव यांची निर्मिती करावी. तसेच निर्माल्य टाकणेसाठी निर्माल्यकलशांची ठिकठिकाणी निर्मिती करावी. इतर जलस्त्रोतांमध्ये मूर्ती किंवा निर्माल्य यांचे सर्जन केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. 20. नगरपालिका/ ग्रामपंचायत यांचे मार्फत गणेशमूर्ती संकलन वाहनाची व्यवस्था करण्यात यावी जेणे करून गर्दी टाळणे शक्य होईल. 21. गणेशोत्सक कालावधीत विदयुत पुरवठा अखडीत राहील यासाठी विदयुत वितरण कंपनीने दक्ष रहाण्याच्या सूचना संबंधिताना देण्यात आलेल्या आहेत. 22. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम सूचना पाळून रत्नागिरीकरांनी गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
महाराष्ट्रात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते. ठिकठिकाणी शेतीचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या अतिवृष्टीमध्ये राज्यातील सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टी बधितांना 2019 च्या वाढीव दराप्रमाणे मदत देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केले आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबधितांना मोठा दिलासा मिळणार आहे.या बाबतची महिती डायरेक्टर जनरल ऑफ इन्फोरमेशन ऍण्डपब्लिक रिलेशन कडून ट्विट करण्यात आले आहे.
उत्तराखंड मधील ऋषिकेश- डेहराडून मार्गावरील राणीपोखरी जवळील जखन नदीवर उभारण्यात आलेला पूल हा कोसळला. पुलाच्या पिलेरखालील माती साकल्याने हा पूल कोसळल्याचे बोलले जात आहे. यावेळी पुलावरून प्रवास करणारी वाहने नदीपात्रात कोसळल्याचे समोर येत आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जखननदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले. या पाण्याचा वेगही खूप जास्त असल्याने हा पुल कोसळल्याचे बोलले जात आहे. जखन नदीवरील हा पूल 57 वर्षे जुना आहे. हा पूल कोसळला त्यावेळेस पुलावरून तीन चार चाकी व एक दुचाकी ही अपघातग्रस्त झाल्याचे पुढे येत आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दुचावरून जाणारे दोघेजन किरकोळ जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली.
अंमली पदार्थ विरोधी पथक वांद्रे विभागाकडून मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली. यावेळी नायजेरीन ड्रग्सतस्कराला 3 कोटी 90 लाखांच्या कोकेन ड्रग्ससह ताब्यात घेण्यात आले आहे. या बाबतची माहिती अंमली विरोधी पथकाचे DCP दत्ता नलावडे यांनी दिली.
अंमली विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार नायजेरियन नागरिक ड्रग्स तस्करीसाठी मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच NCB ने सापळा रचून या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून 1 किलो 300 ग्रॅम वजनाचे कोकेन ड्रग्स जप्त करण्यात आले. त्याची किंमत साधारणपणे 3 कोटी 90 लाख इतकी आसल्याचे अंमली विरोधी पथकाकडून सांगण्यात आले. या नायजेरियन नागरिकांचे नाव इनोसेंट लॉरेन्स असल्याचे समोर येत आहे. तो दिवसभर मोहमद अली रोडवर कपड्यांचा व्यवसाय करायचा आणि रात्री ड्रग्सची तस्करी करायचा. वांद्रे पथकाने या नायजेरियन नागरिकाला खार परिसरातून अटक केल्याचे समजते.
विदर्भासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढील 4 दिवस विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता IMD ने वर्तविली आहे.तर सोमवारी मध्य महाराष्ट्रासह कोंकणात पावसाची हजेरी लागेल. यावेळी वेगवान वारे वाहण्याची शक्यता ही IMD ने वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसापासून गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. बंगालच्या उपसागरात वायव्य भगत व तामिळनाडूच्या किनारपट्टी दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील 4 दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या 1व जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जरी केला आहे. तर 29 ऑगस्ट रोजी या 11 जिल्ह्यांसह लातूर व उझमनाबाद या दोन जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा IMD ने दिला आहे. तर सोमवारी मध्य महाराष्ट्रासह विदर्भ व कोंकणात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अफगाणिस्तानच्या राजधानी काबुल वर कब्जा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी आपली क्रूरता दाखवण्यास सुरवात केली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काबुल एअरपोर्टच्या जवळ एका मागोमाग एक असे तीन आत्मघाती हल्ले केले आहेत. यामध्ये अमेरिकी सैन्यासह अनेक अफगाणी नागरिक व मुलांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्या नंतर आय एस आय एस या आतेरिकीसंघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यानंतर काबुल येथील मोबाईल व इंटरनेट सेवा बंद झाली आहे. यातील पहिला हल्ला हा काबुल विमानतळाच्या ऍबे गेटवर तर दुसरा हल्ला हा बेरण हॉटेल जवळ झाला आहे. तर तिसरा हल्ला हा सेंट्रल कबुलमध्ये झाल्याचे समजत आहे.
अफगाणिस्तानच्या राजधानी काबुल वर कब्जा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी आपली क्रूरता दाखवण्यास सुरवात केली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काबुल एअरपोर्टच्या जवळ एका मागोमाग एक असे तीन आत्मघाती हल्ले केले आहेत. यामध्ये अमेरिकी सैन्यासह अनेक अफगाणी नागरिक व मुलांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्या नंतर आय एस आय एस या आतेरिकीसंघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यानंतर काबुल येथील मोबाईल व इंटरनेट सेवा बंद झाली आहे. यातील पहिला हल्ला हा काबुल विमानतळाच्या ऍबे गेटवर तर दुसरा हल्ला हा बेरण हॉटेल जवळ झाला आहे. तर तिसरा हल्ला हा सेंट्रल कबुलमध्ये झाल्याचे समजत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर यांच्या माध्यमातून खेड, दापोली वासियांच्या सोयीसाठी २ सुसज्ज अशा कार्डियाक रूग्णवाहिका सेवेत येणार असून यांचा लोकार्पण सोहळा मनसे अध्यक्ष हिंदुजननायक मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते 26 ऑगस्ट रोजी कृष्णकुंज येथे पार पडला.
वैभवजी खेडेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत जनहितासाठी सदैव तत्पर आहेत. याच जाणिवेतून जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यासाठी विविध उपाययोजना करणे. याच कर्तव्यातून खेड, दापोली वासियांच्या सेवेत रुग्णवाहिका अर्पण व्हावी हीच त्यांची सदिच्छा होती. वैभवजी खेडेकर यांच्या पुढाकाराने खेड, दापोली या शहरासाठी रुग्णवाहिका आयसीयू, व्हेंटिलेटर व ऑक्सिजनयुक्त सुविधांनी सुसज्ज असून नक्कीच या रुग्णवाहिकेंचा फायदा नागरिकांना वेळेवर उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी होईल. या रुग्णवाहिका संकटात असलेल्या व्यक्तींच्या जीवन तारणारी माऊलीम्हणून नावारूपास येतील.या दोन्ही रुग्णवाहिकेचे नियोजन व सेवा सुविधा पुरविण्याचे काम खेड सामाजिक कार्यकर्ते बुरान टांके यांच्याकडे असणार आहे.
या प्रसंगी मनसे नेते मा. आमदार श्री. नितीन सरदेसाई साहेब, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिलजी खानविलकर, महिला सेना उपाध्यक्ष व कोकण संपर्क नेत्या स्नेहल ताई जाधव, परिवहन कामगार सेना उपाध्यक्ष सुनिल साळवी, खेड शहर अध्यक्ष तथा गटनेते भूषण चिखले, मनविसे रत्नागिरी संपर्क प्रमुख अमोल साळुंखे, मा. जिल्हाध्यक्ष नंदु साळवी, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड, ऋषिकेश कानडे, मनविसे जिल्हाध्यक्ष पुष्पेंन दिवटे, जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, उपजिल्हाध्यक्ष साईराज देसाई, खेड तालुकाध्यक्ष प्रसाद शेट्ये, शहराध्यक्ष राजु आंब्रे, उपशहर अध्यक्ष सिद्धेश साळवी, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष चेतन धामणकर, रहिम सहिबोले, विभाग अध्यक्ष सागर कवळे, दादु नांदगांवकर, दापोली तालुकाध्यक्ष नितीन साठे, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष अरविंद पुसाळकर, स्वरुप माजलेकर, बुरान टाके, जयेश गुहागरकर, शैलेश गायकवाड, दापोली प्रसिद्धी माध्यम प्रमुख सुजित गायकवाड, उप प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार, दिनेश सकपाळ,साहिल शेलार व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते
भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांचा शिवसेनेला सूचक गंभीर इशारा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधानानंतर संपूर्ण राज्यात तणाव निर्माण झाला होता. यावेळी रत्नागिरीत शिवसेनेने भाजपचे बॅनर ही फाडले होते. यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष विनय नातू यांनी शिवसेनेने बॅनर फाडण्याची सुरवात केली असून भविष्यात तुमचेही ही बॅनर लागणार आहेत असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यात तणाव निर्माण झाला होता. यावेळी रत्नागिरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी शिवसेनेने रत्नागिरी शहरात भाजपचे लावलेले बॅनर फाडल्या प्रकरणीआपली प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्यांनीबॅनर फाडण्याची सुरवात शिवसेनेने केली भविष्यात त्यांचेही बॅनर लागणार आहेत असा सूचक इशारा दिला आहे. तसेच भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेला व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाला मिळणार प्रतिसाद बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हयात शिवसेनेने निदर्शने केली आहेत. त्या त्या ठिकाणी डॉ. विनय नातू हे स्वतः कॉर्नर बैठक घेणार असल्याचे जाहीर केले.
मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांच्या माध्यमातून खेड व दापोली शहरासाठी सुसज्ज आशा 2 कार्डिअक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकेंचा लोकार्पण सोहळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणारआहे.
खेड न. प. चे नगराध्यक्ष व राज्य सरचिटणीस यांच्या प्रयत्नातून खेड व दापोली शहरासाठी 2 सुसज्ज आशा कार्डिअक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रुग्ण वाहिकेचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. हा लोकार्पण सोहळा 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता राज ठाकरेंच्या निवास स्थानी म्हणजे कृष्णकुंजवर होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले आहे. या रुग्ण वाहिक खेड व दापोली वासीयांच्या सेवेत रुजू होणार असून यासाठी अत्यंत माफक दरात ही उपलब्ध होणार आहे. तालुक्यात व जिल्ह्यातकोरोना कालावधीत रुग्णांना कार्डिअक रुग्णवाहिका उपलब्ध होताना अडचणींचा सामना करावा लागत होता. जरी त्या उपलब्ध झाल्या तरी इतर शहरातून मागवून घ्याव्या लागत असल्याने त्यासाठी पैसे ही जास्त मोजावे लागत होते. यामुळे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी खेड व दापोली वासीयांसाठी कार्डिअक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिलीआहे.या दोन्ही रुग्ण वाहिकेचे नियोजन व सेवा सुविधा पुरविण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते बुऱ्हाण टांके यांच्याकडे असणारअसल्याचीमाहिती बुऱ्हाण टांके यांनी आमच्याशी बोलताना दिली.
खेड तालुक्यातील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी रुग्णवाहिक उपलब्ध करून दिली. त्याचा लोकार्पण सोहळा 25 ऑगस्ट रोजी कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडला. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केले. यावेळी शिवसैनिक, युवसैनिक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
खेड न. प. चे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी काही दिवसांपूर्वी ज्यांना भाऊ नाही त्यांनी आपल्याला राखी बांधावी असे जाहीर आवाहन केले होते. त्यांच्या आव्हानाला खेड वासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद अनेक महिलांनी रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून रक्षा बंधन साजरे केले होते. रक्षा बंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्याचा पवित्र सण म्हणून ओळखला जातो. राखी म्हणजे विश्वास, राखी म्हणजे भाऊ, राखी म्हणजे रक्षण अशी वेगळी ओळख या सणाची आहे.
याचेच औचित्य साधून खेडचे नागराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी खेड शहरातील महिलांना रक्षा बंधनासाठी आवाहन केले होते. यावेळी खेड न. प. च्या महिला सफाई कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षांना राखी बांधून औक्षण केले. यावेळी नगराध्यक्षानीही आपल्या बहिणींना कायम त्यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्द्ल केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ निर्माण झाला होता. या प्रकरणी त्यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे झाले होते. आज मंगळवार दि. 24 ऑगस्ट रोजी त्यांना संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथून रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांना संगमेश्वर पोलीस स्थानकात नेण्यात आले होते. येथून त्यांना सायंकाळी महाड येथे नेण्यात आले. सायंकाळी 7.45 सुमारास खेड भरणे नाका येथून त्यांना घेऊन पोलीसंचा ताफा महाड कडे रवाना झाला. यावेळी खेड शहर भाजपने घोषणा देत त्यांचे स्वागत केले. कोणत्याही प्रकारची अनुचीत घटना घडू नये यासाठी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. दुपारी 2.30 च्या सुमारास संगमेश्वर गोळवली येथून ताब्यात घेतले. संगमेश्वर पोलीस स्थानकातून नारायण राणेंना महाड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना घेऊन सांयकाळी 5.15 च्या सुमारास महाड दिशेने रवाना झाले आहेत.महाडच्या न्यायालयात त्यांना हजर करणार असल्याचे आता समोर येत आहे.
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची 23 ते 25 ऑगस्ट 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात जन आशिर्वाद यात्रा चालू आहे. सदर यात्रेदरम्यान 23 ऑगस्ट 2021 रोजी महाड येथे पत्रकारांशी संवाद साधत असून त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे तसेच आगामी कालावधीत 30 ऑगस्ट 2021 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व 31 ऑगस्ट 2021 रोजी गोपाळकाला असे उत्सव साजरे होणार आहेत. वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्हयात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात येत आहे. जिल्हादंडाधिकारी , रत्नागिरी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) सन 1951 चा कायदा 22 वा नुसार मिळालेल्या अधिकारान्वये दिनांक 24 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 वा. पासून ते दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 12 वाजे पर्यंत जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे या आदेशान्वये वरील कालावधीत खालील कृत्य करण्यास मनाई करणेत येत आहे.
शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्रे फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, अगर सोंग आणणे, अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांनी विनापरवानगी एकत्र येणे या कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.
सदरचे आदेश अंतयात्रा, धार्मिक विधी, धार्मिक मिरवणूक, लग्नसोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी या बाबीना लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही, असे जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी यांनी आदेशीत केले आहे.
मुख्यमंत्र्याविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी खा. राणे वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी त्यांना संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे थांबवून ठेवले आहे. मात्र अद्याप ही अटक करण्यात आली नसल्याचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अटक वॉरंट दाखवा आम्ही गाडीत बसायला तयार आहोत असे स्पष्टपणे सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने राणेंचा जमीन अर्ज फेटल्यानंतर हाय कोर्टाने ही तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्याने राणेंना दिलासा मिळाला नाही. यामुळे राणेंना अटकपूर्व जमीन होणार नसून त्यांची अटकेची प्रक्रिया सुरू आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी यांनी गुन्ह्याची संपूर्ण माहिती व कारवाईची माहिती केंद्रीय मंत्र्यांना दिली. या प्रकरणी त्यांनी रत्नागिरी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मात्र या ठिकाणी त्यांचा अटक पूर्व जमीन अर्ज फेटाळल्याची माहिती विस्वनिय सूत्रांकडून मिळत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे समुरण महाराष्ट्रात आंदोलने सुरू झाली. दुपारी 2.45 च्या सुमारास संगमेश्वर गोळवली येथून ताब्यात घेतल्याचे खात्रीशिर सूत्रांकडून समोर येत आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणीहॉस्पिटल जवळ असणाऱ्या काळकाईकृपा हॉटेल समोर केमिकल टँकरला आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर गाडी बेवारस स्थितीत सोडून चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच खेड न. प. च्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच खेड रेस्क्यू टीम, मदत ग्रुप यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाने ही आग विझवली असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. टँकरचे ब्रेक पॅड गरम होऊन ही आव लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या टँकरमध्ये पेंट्ससाठी लागणारे केमिकल असल्याचे ही सांगण्यात येत आहे.
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी नाना पेठेत गुरुवारी सायंकाळी नो पार्किंग मध्ये उभी असलेली दुचाकी पहिली. ती उचलण्यासाठी टोईंग कर्मचारी धावले मात्र यावेळी चालक गाडीवर बसला. पण नियम तो नियमच असे दाखवत चक्क दुचाकी चालकासह टोईंग व्हॅनने उचलली. या घटनेने नाना पेठेत बघ्यांची गर्दी झाली आणि वाहतूक ही विस्कळीत झाली.
गुरुवारी सायंकाळी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी नाना पेठेत एक दुचाकी नो पार्किंग मध्ये उभी असल्याचे पाहिले. यावेळी टोईंग व्हॅनचे कर्मचारी गाडी उचलण्यासाठी धावत गेले. मात्र यावेळी शेजारीच उभ्या असलेल्या दुचाकी चालकाने गाडीचा ताबा घेतला आणि तो गाडीवर बसला. यावेळी दुचाकीस्वार व टोईंग कर्मचारी यांच्यात बाचाबाची सुरू झाली यावेळी टोईंग वाल्यानी चक्क स्वरासाहित ही दुचाकी क्रेनने उचलली. यावर दुचाकी स्वराने आपण रस्त्याच्या कडेला उभा असल्याचा तर टोईंग वाल्यानी गाडी नो पार्किंग मध्ये पार्क केल्याचा दावा केला आहे. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मागवली आहे.
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड फॅक्टरीत झालेल्या 100 कोटींच्या घोटाळ्याची माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर दगड व शाई फेकली.दुपारी 12.30 व सुमारास ही घटना घडली.
भारतीय जानता पार्टीचे नेते किरीट सोमय्या हे खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड या फॅक्टरीत झालेल्या 100 कोटींचा घोटाळा उघडकीस करण्यासाठी ते आज 20 ऑगस्ट रोजी वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या गाड्यांचा ताफा बालाजी फॅक्टरी समोरून जात असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर 3 दगड भिरकावले. तसेच त्यांच्या गाडीवर शाई ही फसण्यात आली. ही बातमी त्यांनी स्वतः त्यांच्या twitter वरून सहशेअर केली. यावेळी ते स्वतः गाडीतून प्रवास करत होते. त्यांचा गाडी वरदगडफेक झली. त्यावेळेस ते स्वतः त्या गाडीतून प्रवास करत होते.
बुलढाणा जिल्ह्यातील ताडेगाव जवळ मजुरांना घेऊन जाणार ट्रक उलटून अपघात झाला. या अपघातात 12 जण ठार झाले असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व मजूर माध्यप्रसेश व बिहार मधील असल्याचे समोर येत आहे. हा अपघात दुपारी 12 वा. सुमारास घडला.
बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड गावाजवळ असणाऱ्या ताडेगाव फाट्याजवळ डंपर उलटून हा अपघात झाला. समृद्धी महामार्गाच्या कामासाठी स्टील घेऊन हा डंपर ताडेगाव कॅम्प मध्ये निघाला होता. या महार्गाच्या कामासाठी असलेले मजूर ही या डंपरमधून प्रवास करीत होते. हा डंपर ताडेगाव फाट्याजवळ आला असता तो खड्यात उलटला. यावेळी डंपर मधील 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर 3 मजूर या अपघातात जखमी झाले असून त्यांना जालना येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी विभागीय संपर्क नेत्यांची नेमणूक जाहीर केली. यावेळी कोकणचा ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे रामदास कदम यांची विभागीय संपर्क नेते म्हणून निवड करण्यात आली. यामुळे आता कोकणच्या वाघाकडे मराठवाड्याचे नेतृत्व असे म्हणल्यास वावगे ठरू नये.
माजी विरोधी पक्षनेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम यांची पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी विभागीय संपर्क नेते म्हणून नेमणूक जाहीर केली. त्यांच्यावर मराठवाडा विभागाची जबाबदारी देण्यात आली. या विभागांतर्गत संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, धाराशिव, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. उत्कृष्ट संसद पट्टू पुरस्कार प्राप्त रामदास कदम यांची प्रशासनावर चांगली पकड आहे. उत्तम संघटन कौशल्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या गुणांचा उपयोग आता मराठवाड्यात संगठना बळकटीकरणासाठी होणार आहे. कोकणात अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या पूरपरिस्थितीत त्यांनी स्वतः ग्राउंड लेवलला उतरून प्रशासकीय यंत्रेणेला अतिशय उतकृष्ट पद्धतीने हाताळले होते. सर्वसामान्यांचा नेता आणि स्वर्गीय बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक आता मराठवाड्याची धुरा सांभाळणार आहेत. कोकणचा वाघ आता मराठवाड्यात गर्जणार असून विरोधकांच्या तोंडाला फेस आणल्याशिवाय राहणार नाही.
सुभाष देसाईंना कोकणची जबाबदारी शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर कोकणची जबाबदारी देण्यात आली आहे. निकत्याच जाहीर करण्यात विभागीय नेत्यांच्या निवडीत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सुभाष देसाई यांच्यावर कोकणची जबाबदारी दिली आहे. यामध्ये ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या जिल्ह्यांच्या विभागीय नेतेपदी सुभाष देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले खेड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य आता भाजपाच्या वाटेवर जात असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बेकायदेशीर मालमत्तांची पोलखोल करणाऱ्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यां सोबत रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये बंद दाराआड भेट घेत चर्चा केल्याने खेड तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार की काय? अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून लौकिक असणाऱ्या या सन्मानीय गृहस्थांनी मध्यंतरीच्या काळात हातातले घड्याळ काढून टाकले आणि धनुष्यबाण सोबत घेऊन राजकीय आखाड्यात दाखल झाले. धनुष्यबणाच्या कृपेने त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाले आणि ते निवडून देखील आले. बर बाहेरच्या पक्षातून आलेल्या या सन्माननीय गृहस्थांचा शिवसेनेने यथोचित सन्मान करत त्यांना चक्क सभापती पदावर विराजमान केले. पण नुकतेच त्यांचे सभापती पद गेले आणि हे नेतृत्व कुठेतरी दुखावले गेले अशी चर्चा सुरू झाली. बर नुसती चर्चा रंगली असती तर त्यात तथ्य आहे असं कुणालाच वाटलं नसत. पण सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बेकायदेशीर मालमत्तांची पोलखोल करणाऱ्या एका भाजपा नेत्यांचे कोकणात वारंवार दौरे होत आहेत. या दौऱ्यामध्ये या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत बंद दाराआड या महाशयांनी नेमकी काय चर्चा केली असेल? याचे सध्या तरी फक्त अंदाज बांधले जात आहेत. पण जे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इतक्या सहजपणे उडी मारतात त्यांचा भरवसा काय, आता दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात जाण्याची त्यांनी तयारी केल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. या महाशयांचे सभापती पद गेले असले तरी यांच्या गाडीवर लावलेली सभापती पदाची पाटी मात्र अजूनही तशीच आहे. त्यामुळे माजी सभापती आजही स्वतःला सभापती समजतात की काय अशी देखील चर्चा आता होत आहे. आता धनुष्यबाण पेलणे कदाचित वयोमानानुसार आणि प्रकृतीमुळे त्यांना शक्य होत नसेल म्हणूनच या महाशयांनी धनुष्यबनाचे ओझे बाजूला ठेवून हातात कमळ घ्यायचे निश्चित केले असावे असाही अंदाज सध्या वर्तवला जात आहे. सभापती पद गेल्याच्या धक्क्यातून या महाशयांना अजूनही हा धक्का पचवता आलेला नाही हेच खरं म्हणावं लागेल. भाजपा नेत्यांची भेट घेऊन बंद दाराआड केलेल्या चर्चेला भविष्यात कितपत यश येईल हे सध्या सांगणे कठीण आहे. स्वतःच्या गाडीवर असलेली सभापती पदाची पाटी बदलण्यासाठी कमळाच्या वाटेवर जायची तयारी बहुतेक पूर्ण झाली असल्याची देखील सध्या चर्चा आहे. पण या महाशयांच्या उतावीळपणाला कमळवाले कसा प्रतिसाद देतील याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे. पण या महाशयांना ज्यांनी धनुष्यबाण दिला होता त्यांच्यापर्यंत जर हा विषय गेला तर कमळाकडे जाण्याच्या मार्गावर त्यांना प्रचंड अडचणी देखील उदभवतील हे देखील तितकंच खरं आहे. असो सवयीप्रमाणे हे माजी सभापती आता पुन्हा एकदा आपले नेतृत्व बदलण्यासाठी जोरदार हालचाली करत आहेत, पक्ष बदलणे हे त्यांच्यासाठी नवीन नाही आणि चर्चा करणाऱ्यांसाठीही नवीन नाही. त्यामुळे कमळ हातात घ्यायची तयारी केलेल्या या सभापतींच्या (माजी) गुप्त भेटीतून नेमके काय समोर येईल हे आत्ताच ठरवणे योग्य होणार नाही.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील 6 अधिकाऱ्यांच्या काल सांयकाळी बदलीचे आदेश गृहविभागाकडून प्राप्त झाले असून तात्काळ नवीन ठिकाणी हजर होण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. यामध्ये रत्नागिरी शहराचे पो. नि. अनिल लाड व चिपळूणचे पो. नि. देवेंद्र पोळ यांची रायगड येथे बदली झाली.
गृह विभागाकडून काल संध्याकाळी उशिरा याबाबत आदेश मिळाले असून संबंधितांना तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये 2 पोलीस निरीक्षकासह 4 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये समस बेग, महेश धोंडे, विकास चव्हाण आणि अस्मिता पाटील या पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. या 4 पोलीस उपनिरीक्षकासह 2 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या रायगड येथे झाल्या आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी शुभेच्छादिल्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील 6 अधिकार्यांच्या बदल्या झाल्या. तर जिल्ह्यात नव्याने दाखल होणारे अधिकरी पुढील प्रमाणे – पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, दादासाहेब घुटुकडे आणि सुजाता तानवडे यांची रायगड मधून रत्नागिरीत बदली झाली. पोलिस उपनिरीक्षक विनायक माने हे पालघर मधून, हर्षद शिंगे रायगडहुन तर गायत्री पाटील व शीतल पाटील या सिंधुदुर्गातून रत्नागिरीत दाखल होत आहेत.
साधू वासवणी चौकातील पुणे पोलीस आयुक्तल्याच्या गेटवरच एकाने पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. या इसमाने स्वतःला पेटवून घेतल्यानंतर थेट आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये आत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी संबंधित इसमाला अडवून त्याची आग विझवून त्याला रुग्णालयात दाखल केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.
सुरेश विठ्ठल पिंगळे रा. खडकी हा इसम बुधवारी सकाळी 11.30 वा. सुमारास पोलीस आयुक्तालयाच्या गेटवर आला. यावेळी आयुक्तालयात येणाऱ्या जाणाऱ्याची लगबग सुरु होती. येणाऱ्या प्रत्येकाची नोंद केल्यावरच त्यांना आत सोडण्यात येते. बुधवारी सकाळी पिंगळे यांनी गेटवर पोहचताच स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर त्यांनी पेटत्या अवस्थेत आयुक्तालयांच्या कार्यालयात प्रवेश करण्यासाठी गेटवरून आत धाव घेतली. यावेळी गेटवर बांदोबस्तासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पिंगळे यांची आग विझवली व त्यांना आत जाण्यापासून रोखले. या घटनेत पिंगळे गंभीर रित्या भाजले असून त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस अधिक तपास करत आहेत.
लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा शपथविधी व पद्ग्रहन सोहळा शुक्रवार 13 ऑगस्ट रोजी पार पडला. या कार्यक्रमाला झोन चेरमन ला. विनया चिखले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा पद्ग्रहन सोहळा अध्यक्ष राजेश जॉयसर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून डॉ. विरेंद्र चिखले तर इंडक्शन ऑफिसर म्हणून ला. पंकज शहा उपस्थित होते. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात नूतन अध्यक्ष ला. ओंकार गोंदकर, ला. शैलेश धारिया यांनी सचिव, ला. निनाद चिखले यांनी खजिनदार तर 1st VP म्हणून राकेश तरकांत जैन यांच्यासह 2021- 2022 च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा शपथविधी व पद्ग्रहन सोहळा पार पडला.
उपविभागीय प्रांताधिकार्यांनी त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या महिलेकडे चक्क शरीरसुखाची मागणी केली असा आरोप संबंधित तलाठी महिलेने विडिओ क्लिपद्वारे भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे केलीआहे. या विडिओत त्यांनी न्याय मिळवून देण्याची मागणीही केली आहे.
राज्यातील येवला तालुक्याच्या प्रांताधिकाऱ्यांचा प्रताप आता समोर आला आहे. प्रांताधिकारी सोपान कासार यांनी त्यांच्याच कार्यालयात काम करणाऱ्या महिलेकडे त्यांनी चक्क शरीरसुखाची मागणी केली आहे. त्या महिलेने त्यांचीमागणी फेटाळून लावल्यानंतरया प्रांताधिकाऱ्यानेत्या महिलेची तालुक्याबाहेर बदली केली आहे. या महिलेने आपल्यापेक्षा ही सिनियर दोन कर्मचारी असून त्यांची मात्र बदली करण्यात आली नाही. या बदलीच्या विरोधात त्यांनी मॅट मध्ये धाव घेतली असून त्याचा निकाल ही लवकरच येईल. या प्रांताधिकर्यांनी मॅटच्या निर्णयानंतर बदल घेण्याची धमकी दिल्याचा आरोप ही पीडित महिलेने केला आहे.या अन्याय संदर्भात त्यांनी भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ याना व्हिडिओ द्वारे न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटनवैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगाभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटन विकास होऊन रोजगार निर्मिती आणि अर्थ व्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) विविध उपक्रमांचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार-सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्य डॉ. अनिता मुदलीयार, मेक माय ट्रीपचे हरजित कुमार, स्कायहायचे रुद्र बंधू सोळंकी, हर्षिल कोरिआ आदी मान्यवर उपस्थित होते. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्यासह पुणे आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
गणपतीपुळे येथील बोट क्लबसह संकेतस्थळ व पर्यटन निवासाचा शुभारंभ एमटीडीसीने जलद आणि अधिक कार्यक्षम सेवा देण्यासाठी सुधारीत बुकींग इंजिन तसेच राज्यातील पर्यटनस्थळांच्या तपशीलवार माहितीसह नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. तसेच सिंहगड (जि. पुणे) येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) येथे बोट क्लब सुरु करण्यात येत असून या तिन्ही उपक्रमांचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते यावेळी शुभारंभ करण्यात आला.
मेक माय ट्रीप, स्काय-हायसह विविध संस्थांसमवेत सामंजस्य करार एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे बुकींग अधिक सुलभ होणे आणि जगभरातील पर्यटकांसाठी ही बुकींग सुविधा उपलब्ध होण्यासाठी मेक माय ट्रीप आणि गो आय बीबो या नामांकित संकेतस्थळांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे एमटीडीसीची पर्यटक संकुले आता ही संकेतस्थळे वापरुन कोठुनही बूक करता येणार आहेत. महाराष्ट्रात स्काय डायव्हींग साहसी क्रीडा प्रकार सुरु करण्याच्या दृष्टीने स्काय-हाय सोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच एमटीडीसी कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्यासोबतही आज सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील आणि संबंधीत संस्थेच्या प्रतिनिधींनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
राज्यात पर्यटनाच्या अमोघ संधी कोरोनामुळे सध्या पर्यटनावर बंधने असली तरी विविध धोरणे ठरविणे आणि पर्यटनस्थळाच्या पायाभुत सुविधा-सेवांमध्ये वाढ करण्याबरोबर राज्याच्या पर्यटन विकासासाठी पर्यटन विभाग घेत असलेले निर्णय कौतूकास्पद आहेत. आपल्याकडचे पर्यटन वैभव जगासमोर नेणे आणि त्यात नवनवीन पर्यटनस्थळांची, नवनवीन बाबींची भर टाकणे गरजेचे आहे. मुंबई हे पर्यटन वैविध्याने नटलेले शहर आहे. येथे समुद्रकिनारा आहे, वन्यजीवन आहे, प्राचीन मंदिरे-गुंफा आणि किल्ले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे जंगल तर फ्लेमिंगो अभयारण्य देखील आहे. या सर्वांच्या सोबतीला आधुनिकतेची जोड आहे. आता मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय सुरु करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. आपले राज्यही अशाच पद्धतीने पर्यटन वैविध्याने नटले आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर आपण फक्त विठोबाचे दर्शन घेतो. पण हे मंदीर सुद्धा पाहण्यासारखे असून तिथल्या खांबांवर नक्षीकाम आहे, विविध पौराणिक प्रसंग त्यावर कोरण्यात आले आहेत. लोणार परिसरातील मंदीरेही अशाच पद्धतीने ऐतिहासिक आणि आप्रतिम आहेत. ॲमस्टरडॅमच्या टुलीप गार्डनच्या धर्तीवर आपल्याला सातारा जिल्ह्यातील कास पठारावर फुलांचे पर्यटन करता येईल, असे त्यांनी सांगितले.
सेवा सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात एमटीडीसीने त्यांच्या पर्यटक निवासांच्या नुतनीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराचे मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले. ते म्हणाले की, जगभरातील कोणताही पर्यटक जेव्हा बुकींग करेल तेव्हा त्याने एमटीडीसीच्या पर्यटक निवासाला प्राधान्य द्यायवा हवे, अशा पद्धतीने चांगल्या दर्जाच्या सेवा-सुविधांची तिथे उपलब्धता करा. स्काय-हायसोबत आज करण्यात आलेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील साहसी पर्यटनाला चालना मिळणार आहे. अशा सर्व माध्यमातून राज्यातील पर्यटन वैभव जगभरासमोर खुले करण्यासाठी यापुढील काळातही पर्यटन विभागाला सर्वतोपरी प्रोत्साहन देण्यात यईल, असे त्यांनी सांगितले.
पर्यटन विकासावर राज्य शासनाचे विशेष लक्ष : उपमुख्यमंत्री अजित पवार आज सुरु करण्यात आलेले सर्व उपक्रम राज्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना देणारे आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे तर महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्षे झाली असली तरी देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. हा इतिहास गौरवशाली आणि समृद्ध आहे. हा इतिहास योग्य पद्धतीने लोकांपर्यत गेला पाहिजे. त्यासाठी पर्यटनवाढीला चालना देण्याची गरज आहे. राज्याच्या पर्यटनवाढीसाठी आपण अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. पर्यटन विभागाला अधिकचा निधी देण्याची सरकारची तयारी आहे. कारण पर्यटन क्षेत्रात मोठी ताकद आहे. पर्यटकांच्या माध्यमातून देशाचा इतिहास जगभरात पोचतो. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो. अर्थव्यस्थेला चालना मिळते. जगभरात अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटनक्षेत्र सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे, त्यामुळे राज्यातील पर्यटन विकासावर राज्य शासनाचे विशेष लक्ष आहे. त्याचाच एक भाग म्हणून पर्यटन दिनाचे औचित्य साधून राज्यातील आदरातिथ्य क्षेत्रातील घटकांबरोबर २ हजार ९०५ कोटी रुपयांचे सामंजस्य करार आपण केले. या सामंजस्य करारामुळे राज्यातील पर्यटनक्षेत्राला चालना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पर्यटन साक्षरता हवी एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमधील सेवा-सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा आणि स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. तसेच लोकांना पर्यटन साक्षर करणे, पर्यटनस्थळी केरकचरा, प्लॅस्टीक न टाकणे, ऐतिहासिक वास्तुंवर काहीही न लिहीणे याबाबत पर्यटकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. याशिवाय एमटीडीसी आणि पर्यटन विभागाच्या वेबसाईटस् इंग्रजी आणि इतर परदेशी भाषांबरोबरच मराठीमध्येही उपलब्ध असाव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी केल्या.
राज्याला पर्यटनाचा समृद्ध वारसा – बाळासाहेब थोरात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, एमटीडीसीच्या वेबसाईटसला एक व्यावसायीक अंग आहे. आता ही वेबसाईट अधिक दर्जेदार होत आहे. यामुळे राज्याच्या पर्यटन वैभवाची माहिती जगभरातील पर्यटकांसमोर प्रभावीरित्या पोहोचेल. कोकणामध्ये निसर्गाचा खजिना उपलब्ध आहे. अजिंठा-वेरुळ, घृष्णेश्वर, देवगिरीसारखी अनेक पर्यटनस्थळे देशातील आणि जगभरातील पर्यटकांची आकर्षणकेंद्रे आहेत. राज्यातील हा ऐतिहासिक आणि समृद्ध वारसा जगभरातील पर्यटकांसमोर नेण्यासाठी पर्यटन विभागाने घेतलेला पुढाकार आणि त्यासाठी आज सुरु करण्यात आलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे त्यांनी सांगितले.
कोकण पर्यटनाला नवीन आयाम: उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, आज सुरु करण्यात आलेल्या गणपतीपुळे येथील बोट क्लब तसेच स्काय-हायसोबत करण्यात आलेल्या करारासारख्या उपक्रमांमुळे कोकणातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, साहसी पर्यटनासारखा नवीन उपक्रम कोकणात यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रासारखी पर्यटन समृद्धी इतरत्र कुठेही नाही- आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून पर्यटन बंद असले तरी या क्षेत्राला चालना देण्याच्या अनुषंगाने विविध धोरणे आणि निर्णय या काळात घेण्यात आली आहेत. महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या पर्यटनाच्या संधी आहेत, यासारखी पर्यटन समृद्धी अन्यत्र कुठे आढळून येत नाही. कृषी पर्यटन धोरण, बीच शॅक धोरण, कॅराव्हॅन पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरण मंजुर करण्यात आले आहे. आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्यासाठी याला उद्योगाचा दर्जा देण्याबरोबरच यासाठी परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात हॉटेल सुरु करण्यासाठी आता अनेकांकडून विचारणा होत आहे. राजशिष्टाचार विभागामार्फत नुकतीच मुंबईतील विविध देशांचे महावाणिज्यदूतांसमवेत बैठक संपन्न झाली, त्यांनीही महाराष्ट्राचा पर्यटनवारसा समृद्ध असल्याचे सांगितले. आता आज सुरु करण्यात आलेल्या विविध उपक्रमे आणि सामंजस्य करारातून या क्षेत्राला अधिक व्यापक करण्यासाठी पर्यटन विभागाने पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
सुंदर कोकण जगासमोर आणूया – कु. आदिती तटकरे पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यासह कोकणाच्या पर्यटन विकासासाठी शासनाने मोठा पुढाकार घेतला आहे. यासाठी आजही काही उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. आपण कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याबाबत नेहमी बोलत असतो. पण कोकणाचा पर्यटनासह इतर सर्व क्षेत्रात सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियाने कोकणासारखे होण्याबाबत बोलले पाहीजे, अशा पद्धतीने कोकणाचा विकास करु. सध्या कोरोनामुळे ठप्प झालेल्या पर्यटन क्षेत्राला आज सुरु करण्यात आलेल्या उपक्रमांमुळे चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुरुवातीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांनी प्रास्ताविक करुन पर्यटन विभागाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले, तसेच एमटीडीसीमार्फत आज सुरु करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विष्णूच्या 11 व्या अवताराची उपमा दिल्यानंतर आता पुण्यातील एक भक्ताने चक्क मोदींचे मंदिरच बांधले आहे.
एखाद्याची श्रद्धा त्याला काय करायला भाग पाडेल याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यात चक्क मोदी भक्ताने चक्क नरेंद्र मोदींचे मंदिरच उभारले आहे. पुण्यातील औंध येथील मयूर मुंढे या कार्यकर्त्याने स्वतःच्या हक्काच्या जागेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिरच उभारले आहे. या मंदिरातील पुतळा खास जयपूरहून पिंपरी चिंचवडचे मार्बल व्यापारी दिवानशू तिवारी यांनी तयार करून मागवला आहे. या मंदिराचे उदघाटन औंध येथील जेष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी करण्यात आले. या मंदिर उभारणीसाठी सुमारे 1 लाख 60 हजार इतका खर्च आला. या मंदिराबाहेर मोदींच्या कार्याचे फलक व त्यांच्या कार्यावर तयार केलेली कविता ही लावण्यात आली. मोदींकडून त्यांना प्रेरणा मिळत असल्याने त्यांनी त्यांचे चक्क मंदिरच उभारले.गेल्या काही दिवसांपूर्वी एका कार्यकर्त्याने चक्क मोदींना विष्णूच्या 11 व्या अवताराची उपमा दिली होती. आता तर चक्क देवळात देव म्हणूनच त्यांना स्थानापन्न करण्यात आले आहे. भविष्यात हे ठिकाण धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध झाल्यास आता नवल वाटायला नको.
इंडियन क्रिकेट कोन्सिलने यावर्षी होणाऱ्या T-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा भार्ट्सत न होता आता ओमान व युरोपमध्ये होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आईसीसी ने हा निर्णय घेतला आहे. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे भारत आणि पाकिस्तान यांचा सामना दुबईतील मैदान खेळवण्यात येणार आहे.
यंदाच्या वर्षी होणारी T-20 क्रिकेट स्पर्धा ही 17 ऑक्टोम्बर पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी ही 14 नोव्हेंबरला दुबईत खेळवली जाईल. 17 ऑक्टोम्बर रोजी ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्या सामन्याने या स्पर्धेची सुरवात होईल. एकमेकांचे कट्टर व जुने प्रतीस्पर्धी इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात 30 ऑक्टोबर रोजी तर भारत व पाकिस्तान मध्ये 24 ऑक्टोम्बर रोजी सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेचा पहिला व दुसरा उपांत्य सामना 10 व 11 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर अंतिम सामना हा 14 नोव्हेंबरला दुबईत खेळवला जाईल.