
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील 6 अधिकाऱ्यांच्या काल सांयकाळी बदलीचे आदेश गृहविभागाकडून प्राप्त झाले असून तात्काळ नवीन ठिकाणी हजर होण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. यामध्ये रत्नागिरी शहराचे पो. नि. अनिल लाड व चिपळूणचे पो. नि. देवेंद्र पोळ यांची रायगड येथे बदली झाली.
गृह विभागाकडून काल संध्याकाळी उशिरा याबाबत आदेश मिळाले असून संबंधितांना तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये 2 पोलीस निरीक्षकासह 4 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये समस बेग, महेश धोंडे, विकास चव्हाण आणि अस्मिता पाटील या पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. या 4 पोलीस उपनिरीक्षकासह 2 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या रायगड येथे झाल्या आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील 6 अधिकार्यांच्या बदल्या झाल्या. तर जिल्ह्यात नव्याने दाखल होणारे अधिकरी पुढील प्रमाणे – पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, दादासाहेब घुटुकडे आणि सुजाता तानवडे यांची रायगड मधून रत्नागिरीत बदली झाली. पोलिस उपनिरीक्षक विनायक माने हे पालघर मधून, हर्षद शिंगे रायगडहुन तर गायत्री पाटील व शीतल पाटील या सिंधुदुर्गातून रत्नागिरीत दाखल होत आहेत.
*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN