राज्यात सरसकट शाळा सुरू होणार?, टास्क फोर्सच्या बैठकीत अंतिम निर्णय
राज्यातील शाळा सरसकट सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाचे अधिकारी सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत राज्य शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक घेत चर्चा केली. यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी सरसकट शाळा सुरू करण्यास सकारात्मक असल्याचे दिसून आले. मात्र शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ व टास्क फोर्सच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील जि. प. शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता येण्यासाठी शासनाने “आर्दश शाळा” हा महत्वपुर्ण उपक्रम हाती घेतला असून यामध्ये प्रत्येक जि. प. च्या CEO ने लक्ष घालण्याचे निर्देश राज्य शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत.
*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H1bXCMqHUYV2v1SygtgWWg