डंपरने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी हातखंबा रस्त्यावरील टीआरपी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ सकाळी नऊ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात डंपरने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन जणांना चिरडले यात दोघांचाही जागीच होण्याची दुर्दैवी घटना घडली. मुक्तेश्वर सहदेव ठीक (58, रा प्रशांतनगर रत्नागिरी) व राघो कृष्णा धुरी (68, रा साईनगर रत्नागिरी) अशी या अपघातात मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. मुक्तेश्वर हे महावितरण चे कर्मचारी होते.


रत्नागिरी ते हातखंबा मार्गावर दिवस-रात्र प्रचंड वर्दळ असते. सकाळच्या सुमारास गाव-खेड्यातील नागरिक आपल्या दैनंदिन कामासाठी शहरात येत असतात. यातच सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने सर्वच भागातील रस्ते एकाच वेळी खोदल्याने रस्त्यावरील प्रवास वाहन चालकां साठी जीवघेणा ठरत आहे.

©️2024 Times Marathi News, Media Network
Editor – Rakesh Koli
Rg.No.MH-28-0054845
Khed, Ratnagiri

ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा

🪀 व्हाट्सअप ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/CEeDRKqaMDTBB15bt7AuLg

👤 फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/share/D44NdYnfuQVHqqY9/?mibextid=qi2Omg

🌀 इंस्टाग्राम लिंक
https://www.instagram.com/rakesh0946?igsh=emZodDkzc25peWVm

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
👉🏻 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक  8390380101

बोरज येथे 2 ट्रकच्या समोर समोर धडकेत 1 ठार

अधिक माहिती साठी पुढील लिंक वर क्लिक करा https://bit.ly/3uh64MC

रत्नागिरीतील बचत गट मॉल राज्यभर राविण्याच्या सूचना – मुख्यमंत्री शिंदे

राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना बाजारातील मागणी असणाऱ्या वस्तुंच्या निर्मितीचे प्रशिक्षण देणे, भांडवल उपलब्ध करणे आणि त्या वस्तुंचे ब्रांडिंग, मार्केटिंग करणे यासाठी मदत करण्यात येणार आहे. तसेच बचत गटांना त्यांच्या मालाची विक्री करता यावी याकरिता जिल्हा प्रशासनाद्वारे तात्पुरते स्टॉल उपलब्ध करुन द्यावेत. राज्यातील बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि मॉल्स मध्ये काही स्टॉल तातडीने बचत गटांना कसे उपलब्ध करुन देता येतील, याचे नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. दीर्घकालीन उपाययोजना म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बचत गट मॉल ही संकल्पना सुद्धा इतर जिल्ह्यात राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या अभियानातून जास्तीत जास्त महिलांना बचत गटांच्या चळवळीत सहभागी करुन घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यातील महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक वर्षा शासकीय निवासस्थान येथे झाली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह, विविध विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आमच्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी पुढील चॅनल लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va5hOLUJUM2Z6aRJ613C