
कोंकण केसरी राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा आज दि. 21 रोजी खेड तालुक्यातील हेडली गावात मोठ्या उत्साहात पार पडल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे सरकार पुन्हा जनतेला बैलगाडीत बसवेल असे वक्तव्य यावेळी केली.
देशात पूर्वी इंधनाचे दर नियत्रित होते. मात्र हे सरकार आल्यापासून इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जनतेवर पुन्हा बैलगाडी वापरण्याची वेळ येईल असे वक्तव्य या स्पर्धमध्ये त्यांनी व्यक्त केले. या कोंकण केसरी राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण 130 बैलगाड्यानी सहभाग घेतला होता. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अमित कदम यांच्यासह शर्वर कुदुपकर व उमेश कदम यांनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हेडली सावेनी येथील ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, माजी आदा. संजय कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
