लालपरीच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय, 41% टक्के पगारवाढ, 93 हजार कर्मचाऱ्यांचा विजय, उदय सामंत यांची महत्वपूर्ण भूमिका

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी म्हणजे एस टी बस गेल्या 15 दिवसापासून ठप्प आहे. शासनात विलानीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळेच आज लालपरीच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला असून तब्बल 41% टक्के पगारवाढ करण्यात आली असून हा 93 हजार कर्मचाऱ्यांचा हा विजय झाला आहे. विलनीकरण न्यातलायच्या कक्षात असल्याने पगरवाढीच्या मुद्द्यावर हा संप मागे घेण्यात येणार का याचा निर्णय मात्र कर्मचारीच घेणार आहेत. या सर्व प्रकरणात आ. उदय सामंत यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

गेले 15 दिवस एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. परिवहन मंडळाची शासनात विलनिकरण करण्याची प्रमुख मागणी घेऊन संप पुकारला होता. मात्र शासनात विलनीकरण करण्याची मागणी ही मा. उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यासाठी मा. उच्च न्यायालयाने त्री सदस्य समिती स्थापन करून त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. या समितीत मुख्य सचिव, वित्त सचिव व परिवहन विभागाचे सचिव यांचा समावेश असून या समितीने 12 आठवड्यात अहवाल मुख्यमंतत्र्यांकडे द्यावा. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अहवालासह मा. उच्च न्यायालयात हा अहवाल देणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच विलनिकरणचा निर्णय हा मा. उच्च न्यायालयात आहे. त्यासाठी 12 आठवड्यांचा कालावधी मा. उच्च न्यायालयाने दिला असल्याने ग्रामीण जनतेची व विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन आ. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, उदय सामंत या सर्वांनी महत्वाची भूमिका बजावली. विलनिकरनाचा निर्णय जर समितिने अहवालातून राज्य शसनाला दिला तर तो मान्य असेल असे सूचक वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले. यावेळी परिवहन विभागाच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केली. आता पर्यंतची सर्वात मोठी म्हणजे 41% टक्के इतकी पगारवाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. यामध्ये 1 ते 10 वर्षे नोकरी झालेल्या गटातील कर्मचाऱ्यांना 5 हजाराची, 10 ते 20 वर्षे नोकरी केलेल्या गटातील कर्मचाऱ्यांना 4 हजाराची तर 20 वर्षाहून आधी काळ नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यांना 2.5 हजाराची पगारवाढ जाहीर करण्यात आली. तसेच एस टी कर्मचाऱ्यांचा पगार हा दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत देण्याची हमी राज्य सरकारने घेतली. तसेच परिवहन विभागाचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भत्ता देणार असल्याचे ही त्यांनी यावेळी जाहीर केले. राज्य शासनाकडून कर्मचार्यांना तात्काळ कामावर हजर होण्याची विनंती देखील केली आहे.

Leave a Comment