किरीट सोमय्यावर 100 कोटींचा दावा

72 तास उलटताच अनिल परब यांनी केला दाखल

परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना 72 तासात माफी मागा अन्यथा तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेन असे सांगितले होते. 72 तास उलटल्यानंतरही किरीट सोमय्या यांनी माफी न मागितल्याने अनिल परब यांनी आज मुंबई हायकोर्टात 100 कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली. किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या विरोधात दापोलीतील रिसॉर्ट, परिवहन खात्यातील बदल्या यावरून गंभीर आरोप केले होते. त्यामुळे मानहानी झाल्याप्रकरणी अनिल परब यांनी 72 तासात आरोप मागे घेऊन माफी मागा अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा नोटिसद्वारे दिला होता.

*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://www.snapchat.com/add/r_koli5196

Leave a Comment