
मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास कदम यांच्यावर सरकार पडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रसिद्धी पत्रक काढत मी पाठीत खंजीर खुपसत नाही, तर सांगून समोरून अंगावर जातो असे स्पष्ठ केले आहे.

खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलेले आरोप हे बेछूट आसून माझ्या बाबत खोटी वृत्ते सांगून जनतेत, कुटुंबात व पक्षात गैरसमज पसरवत आहेत. माझ्यावर आरोप करून व जनमानसात गैरसमज पसरवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच प्रसाद कर्वे यांचा उपयोग माहितीच्या अधिकारात माहिती घेण्यासाठी केल्याचे ही त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे. मात्र किरीट सोमय्यांना भेटल्याचे किंवा त्यांचे थोबाड पाहण्याचा प्रश्नच येत नाही असे सांगत त्यांनी वैभव खेडेकर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहे. तसेच सत्य जनतेसमोर आल्यानंतर वैभव खेडेकरांचा भ्रमाचा भोपळा फुटेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच निवडणुकी पूर्वी त्यांनी मी कोणतेही पद घेणार नाही असे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केले होते. शिवसेनेने, कोंकणने व महाराष्ट्राने मला भरभरून प्रेम दिले आहे. त्याची परतफेड या जन्मात होऊ शकत नाही. आशा प्रकारच्या बिनबुडाच्या आरोपांना मी भीक घालत नाही असे स्पष्टीकरण शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले आहे.
*आमच्या TIMES MARATHI NEWS च्या अपडेट तुमच्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आम्हाला जाॅईन व्हा किंवा 8390380101 या क्रमांकावर HI मेसेज करा*
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://t.me/joinchat/wy0fp8dr-ts4Mjll
https://wordpress.com/notifications
https://profile.dailyhunt.in/timesmarathinews
https://chat.whatsapp.com/H0byh80Nekn2VHl0oUz2tN
https://www.snapchat.com/add/r_koli5196