रामदास कदमांसह शिवसेनेचे ४० स्टार प्रचारक मैदानात..

राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. आज निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर आता प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरूवात देखील झाली आहे. प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांची यादी तयार झाली आहे. सेलिब्रिटींपासून ते वरिष्ठ राजकीय नेत्यांचा या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी समोर आली आहे.

रविवारपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराला सुरूवात करणार आहे. मुंबईतल्या कुर्ला येथे मुख्यमंत्र्यांची पहिली सभा होणार आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी एकूण ४० स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. या सर्वाची तोफ राज्यभर धडाडणार आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता गोविंदा, अभिनेते शरद पोंक्षेसह अनेक राजकीय नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. प्रचाराचे दिवस शिवसेनेसाठी खूपच महत्वाचा असणार आहे. जास्तीत जास्त मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न यावेळी केला जाणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी

१.एकनाथ शिंदे
२.रामदास कदम
३.गजानन किर्तीकर
४.आंदनराव आडसूळ
५.प्रताप जाधव
६.गुलाबराव पाटील
७.निलम गोऱ्हे
८.मिना कांबळी
९.उदय सामंत
१०.शंभूराज देसाई
११.दीपक केसरकर
१२.तानाजी सावंत
१३.दादा भुसे
१४.संजय राठोड
१५.अब्दुल सत्तार
१६.भरत गोगावले
१७.संजय शिरसाट
१८.श्रीकांत शिंदे
१९.धैर्यशील माने
२०.नरेश मस्के
२१.श्रीरंग बारणे
२२.मिलिंद देवरा
२३.किरन पावसकर
२४.राहुल शेवाळे
२५.शरद पोंक्षे
२६.मनीषा कायंदे
२७.गोविंदा
२८.कृपाल तुमाणे
२९.दीपक सावंत
३०.अनंद जाधव
३१.ज्योती वाघमारे
३२.शीतल म्हात्रे
३३.राहुल लोंढे
३४.हेमंत पाटील
३५.हेमंत गोडसे
३६.राजू वाघमारे
३७.मिनाक्षी शिंदे
३८.ज्योती मेहर
३९.अक्षय भोसले
४०.तेजस्विनी केंद्रे

खेड उबाठा शहराध्यक्षांचा राजीनामा, शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश

Breaking News

खेड शहर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष दर्शन अजित महाजन यांनी मंगळवारी सकाळी अचानक आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून मंगळवारीच ते शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळत आहे. उबाठा गटाच्या शहराध्यक्षांनी अचानक राजीनामा देवून घेतलेल्या निर्णयामुळे खेड तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आणि जिल्हाप्रमुख सांजयराव कदम यांना मोठा धक्का बसला आहे. एक आक्रमक तरुण नेतृत्व, चांगले वक्ते यांच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गटाने गमावले असून त्याचा फायदा आता शिवसेना शिंदे पक्षाला होणार आहे. शहराध्यक्ष म्हणून काम करीत असताना दर्शन महाजन यांनी अनेक आंदोलने आणि उपोषणे करून प्रशासनाचे लक्ष वेधून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या राजीनाम्याने उबाठा पक्षाला खेड शहरात मोठा धक्का बसला असून आगामी विधान परिषद निवडणुकीत याचा फायाड शिवसेना पक्षाला व आ. योगेश कदम यांना मात्र नक्की होईल.

रत्नागिरीतील खलाशाचं मुंडक कापून बोटीवर ठेवलं, बोटीला लावली आग, मृत खलाशी गुहागरमधील

मानसिक संतुलन बिघडलेल्या खलाशाने चक्क तांडेलचे डोके कापून बोट पेटवून दिल्याची धक्कादायक घटना देवगड समुद्रात सोमवारी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण कोकणात एकच खळबळ उडाली आहे. कोस्टगार्डच्या मदतीने बाकीच्या खलाशांना वाचविण्यात यश आले आहे. सिंधुदुर्गातील देवगडच्या समुद्रात रत्नागिरीतील खलाशाचा खून केल्याची घटना सोमवार 28 रोजी दुपारी घडली. झारखंड येथील निर्दयी खालाशाने रत्नागिरी गुहागर येथील खालाचे मुंडके कापले त्यानंतर त्याने रागाच्या भरात बोटीलाच आग लावून दिल्याने भर समुद्रात बोटीचा थरार अंगावर काटा आणणारा होता. या धक्कादायक प्रकाराने रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रवींद्र नाटेकर गुहागर असे ठार झालेल्या या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खोल समुद्रात मासेमारी करिता गेलेल्या नौकेवरील खलाशी व तांडेल यांचेमध्ये आपापसात झालेला वाद विकोपाला जाऊन नौकेवरील तांडेलचा खून करून नौका पेटवल्याची घटना कुणकेश्वर पासून खोल समुद्रात १५ वावाच्या अंतरावर दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली असून बोटीचे सुमारे दीड कोटीचे नुकसान झाल्याचे समजते.

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील संशयित आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा राहणारा छत्तीसगड हा मानसिक रुग्ण असल्याचे समजते. ते नौकेवरील तांडेलाचा खून करून नौकेला आग लागल्यानंतर नौकेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या छोट्या होडीत जाऊन बसला.दरम्यान घटनास्थळी गस्तीनौकेने गेलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. व देवगड येथे देवगड बंदरात आणले व त्याला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की रत्नागिरी येथील राजीवाडा येथील नुमान रफिक फणसोफकर यांच्या मालकीची नुझत राबिया ही नौका रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिरकर वाडा येथून मासेमारी करिता निघाली होती.सोमवारी कुणकेश्वर येथे खोल समुद्रात मच्छीमारी करताना खलाशी व तांडेल यांच्यात वाद झाला.हा वाद विकोपाला गेल्यानंतर नौकेवरील खलाशी जयप्रकाश विश्वकर्मा यांनी तांडेल रवींद्र नाटेकर राहणारा गुहागर याचा खून करून नौका पेटवून दिली. विश्वकर्मा याने नौका पेटविल्यानंतर नौकेमागील असलेल्या छोट्या होडीत जाऊन बसला.नौकेने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच व नौकेवरील खलाशांनी जीवाच्या आकांताने केलेली आरडाओरड ऐकून नजीकच्या नौकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा व नौकेवरील खलाशांना वाचविण्याचा प्रयत्न केला. या नौकेवरील तांडेल धरून एकूण २६ खलाशी होते.
याबाबतची माहिती मत्स्य व्यवसाय अधिकारी पोलीस प्रशासन यांना देण्यात आली .त्यानुसार मत्स्य व्यवसाय अधिकारी पार्थ तावडे यांनी देवगड बंदर येथे येऊन सागर पोलीस शाखेस माहिती दिली. सागर पोलीस शाखेच्या गस्तीनौकेने तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणले.

©️2024 Times Marathi News, Media Network
Editor – Rakesh Koli
Rg.No.MH-28-0054845
Khed, Ratnagiri

ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा

🪀 व्हाट्सअप ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/CEeDRKqaMDTBB15bt7AuLg

👤 फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/share/D44NdYnfuQVHqqY9/?mibextid=qi2Omg

🌀 इंस्टाग्राम लिंक
https://www.instagram.com/rakesh0946?igsh=emZodDkzc25peWVm

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
👉🏻 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक  8390380101

दुसऱ्या यादीतही गुहागरचा उमेदवार नाही, संभ्रम कायम

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील विविध राजकीय पक्षांकडून आपापले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र गुहागर विधानसभा जागेवर शिवसेनेकडून अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. उद्या 28 ऑक्टोबर रोजी राजेश बेंडल हे आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. मात्र या जागेवर यापूर्वी शिवसेनेकडून विपुल कदम यांच्या नावाची देखील चर्चा झाली होती.

शिवसेना पक्षाची दुसरी यादी रविवारी सायंकाळी जाहीर झाली असून यामध्ये विविध 20 जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. मात्र या दुसऱ्या यादीत देखील गुहागर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर न झाल्याने या ठिकाणी पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार नक्की कोण असा प्रश्न आता येथील जनतेसह शिवसैनिकांसमोर उपस्थित झाला आहे. गुहागर विधानसभेच्या जागेवर शिवसेना पक्षाकडून राजेश बेंडल की विपुल कदम कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून 28 ऑक्टोबर रोजी दुपारनंतर या जागेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता देखील राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे.

©️2024 Times Marathi News, Media Network
Editor – Rakesh Koli
Rg.No.MH-28-0054845
Khed, Ratnagiri

ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा

🪀 व्हाट्सअप ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/CEeDRKqaMDTBB15bt7AuLg

👤 फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/share/D44NdYnfuQVHqqY9/?mibextid=qi2Omg

🌀 इंस्टाग्राम लिंक
https://www.instagram.com/rakesh0946?igsh=emZodDkzc25peWVm

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
👉🏻 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक  8390380101

खरी शिवसेना शिंदेचीच – राहुल नार्वेकर

भरत गोगावले यांचा व्हिप वैद्य

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधासभा अध्यक्षांच्या हातात निकाल दिल्याची पहिलीच वेळ असून यांच्या निकालानंतर शिवसेना हा पक्ष कोणाचा हे निश्चित होणार होते. आज दि. 10 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास या निकालाचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरू केले. यावेळी त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे जाहीर करत भरत गोगावले यांनी बजावलेला व्हिप वैद्य असल्याचे ही सांगितले. विधसभा अध्यक्षांच्या निकालामुळे शिंदे गटाला दिलासा तर ठाकरे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.

या निकालाचे वाचन सुरू करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मा. सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. यावेळी मा. सुप्रीम कोर्ट यांनी महत्वाचे मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी दोन्ही गटाच्या वकिलांचे आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी पक्ष ठरवताना त्यांनी घटना, नेतृत्व आणि विधिमंडळ बहुमत हे घटक महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुख कोण यावरून मतांतर असून 2018 मधील शिवसेना पक्षाची घटना महत्वाची आहे. तसेच दोन्ही गटांनी मात्र वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. मात्र निवडणूक आयोगाने एक घटनेची प्रत दिली असून त्यावर कोणतीही तारिक नसल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचना वेळी सांगितले. तसेच श्री. उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या घटनेवर तारीख नसल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच 2018 ला शिवसेना पक्षाची ठाकरेंकडून दिलेली घटना ही चुकीची आहे म्हणून निवडणूक आयोगाने दिलेली घटना वैद्य मनात असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. तसेच शिवसेना पक्षाची 1999 ची घटना मान्य करणार असल्याचे ही नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. तसेच खरी शिवसेना कुणाची हे ठरविण्याचा अधिकार त्यांना स्वतःला असल्याचे ही यावेळी स्पष्ट केले.

निकाल वाचन करताना अध्यक्ष म्हणाले कि, २१ जून २०२२ रोजी शिवसेनेत दोन गट पडले. सेनेत २ गट पडल्याचं २२ जूनला निदर्शनास आले. पक्षात पक्षप्रमुखांपेक्षा राष्ट्रीय कार्यकारणी महत्त्वाची असते. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाही. पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाही. कार्यकारणी ही पक्षात सर्वोच्च असते. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय अंतिम असेल. त्यामुळे एकनाथ शिंदेंची हकालपट्टी मान्य करता येत नाही. पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार बहुमताला आहे. त्यामुळे केवळ ठाकरे किंवा शिंदे यांचे मत ग्राह्य धरता येणार नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार एकनाथ शिंदेंकडे बहुमत असल्यानं शिंदे गटाला पक्ष म्हणून मान्यता देतो. भरत गोगावले यांची नियुक्ती वैध असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावला आहे.

विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये या निकालाचे वाचन करण्यात आले. यावेळी ठाकरे-शिंदे या दोन्ही गटाचे आमदार उपस्थित होते. हे निकालपत्र १२०० पानांचे असले तरी त्यातील ठळक मुद्दे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सभागृहात वाचून दाखवले. या प्रकरणाची सुनावणी घेताना माझ्यासमोर खरी शिवसेना कुणाची आणि व्हिप कुणाचा हा मुद्दा होता. घटना, नेतृत्व आण विधिमंडळ पक्ष हे तीन घटक महत्त्वाचे होते. माझ्यासमोर दोन्ही गटाने पुरावे सादर केले. शिवसेनेच्या पक्ष घटनेचाही विचार निकषात केला गेला आहे. निकाल देताना शिवसेनेची २०१८ ची घटना लक्षात घेतली. विधिमंडळातील बहुमतदेखील ग्राह्य धरले गेले. दोन्ही गटात पक्षप्रमुखपदावरून मतभेद आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष कोणता हे प्रथमदर्शनी ठरवले गेले. पक्ष कुणाचा याबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय विचारात घेतला गेला.

तसेच निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे गटाकडे असलेली शिवसेना खरी आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय मी लक्षात ठेवला. २०१८ मध्ये पक्षात निवडणूक न घेता नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे २०१८ मधील बदल ग्राह्य धरता येत नाही. निवडणूक आयोगाने २०२३ मध्ये घटना देण्यात आली. माझी न्यायकक्षा मर्यादित असल्याने पक्षाचा प्रमुख कोण हे मी ठरवणार आहे. पक्षप्रमुख नव्हे तर राष्ट्रीय कार्यकारणीचा फैसला अंतिम असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला. पक्षप्रमुखांचे मत अंतिम यावर मी सहमत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंची झालेली हकालपट्टी अमान्य आहे असंही राहुल नार्वेकरांनी सांगितले.