राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत पावसाची तीव्रता वाढणार; कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचा इशारा दिला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून, व्यापक पावसासोबतच काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी या काळात अधिकृत सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. पूरप्रवण किंवा धोकादायक भागात जाणे टाळावे. विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली थांबू नये. पूराच्या परिस्थितीत बचावासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेणे महत्त्वाचे असून, गरज भासल्यास स्थानिक निवारा केंद्रांचा उपयोग करावा. तसेच नदी-नाल्यांवरुन पाणी वाहत असताना पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूरस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे आणि सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाने केले आहे.

1 ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती

Bharane naka

खेडमध्ये मुसळधार पाऊस, भरणे नका येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी

अरभी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे कोंकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसात आहे. रविवारी दुपारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहर व भरणे नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमले.

या पाण्यामुळे काही व्यापाऱ्यांच्या दुकानात v नागरिकांच्या घरात ही पाणी शिरल्याने सर्वांची धावपळ उडाली. भरणे नाका येथील परकार कॉम्प्लेक्स येथे सर्व्हिस रोड व मुख्य महामार्गावर पाणी आल्याने नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या पाण्यातूनच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आपला मार्ग काढावा लागत होता.