जर जीव गेला तर जबाबदारी कोणाची?

खेड शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या दोन विविध संस्थांनी आपले विविध महोत्सव एकाच वेळी जवळ जवळ ठेवल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. खेड शहरात असणाऱ्या महाड नाका परिसरातील मैदानात होणाऱ्या कार्यक्रमांना नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या कार्यक्रमासाठी येणारे नागरिक आपल्या विविध वाहनांसह या ठिकाणी येतात. सध्या शहरात फेस्टिवलची क्रेझ सुरू आहे. वर्षाच्या सुरुवातीला खेड वासीयांना अपेक्षित असलेला आणि जिव्हाळ्याचा फेस्टिवल दरवर्षी याच मैदानात भरतो. यंदा मात्र फेस्टिवलसह क्रीडा कार्यक्रमांचे देखील या ठिकाणी अन्य एका संस्थेने आयोजन केले आहे. दरवर्षी पार्किंग साठी वापरण्यात येणाऱ्या जागेत यंदा क्रीडा स्पर्धा होणार आहेत. मात्र समोरासमोर असणाऱ्या दोन्ही जागेच्या मध्ये असणारा रस्ता हा देखील अरुंद असून या ठिकाणी जाण्यास असणारा मार्गही मुख्य मार्गापासून अरुंद आहे. या कार्यक्रमादरम्यान एखादी आपत्ती उद्भवल्यास या ठिकाणी मदत कार्य पोहोचणे देखील मुश्किल होणार आहे. तसेच याच परिसरात शहरातील एकमेव कॉर्डियोलॉजिस्ट दवाखाना असल्याने अत्यंत गंभीर परिस्थितीत असणारे रुग्ण देखील या ठिकाणी उपचारासाठी दाखल होतात. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर खेड वासीयांना असणारा एकमेव आधार म्हणून या रुग्णालयाकडे पाहिलं जाते. मात्र यंदा आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमामुळे या रुग्णालयाच्या मार्गावर वाहतूक कोंडी होणार यात तीळ मात्र देखील शंका नाही.

नेहमीच सामाजिक कार्य करणाऱ्या या संस्था या ठिकाणी आपले महोत्सव साजरे करत असताना जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारासाठी रुग्णालयात या मार्गावरून जात असताना या ठिकाणी झालेली गर्दी व वाहतूक कोंडीमुळे एखाद्या रुग्णाचा जीव दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. खरे तर दोन्ही संघटनांनी शहरासाठी काम करत असताना सर्वप्रथम शहरवासी यांचा विचार करणे गरजेचे असताना देखील सद्यस्थितीला या संघटना व त्यांचे पदाधिकारी केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या संघटनांच्या कार्यक्रमाचा विचार करताना पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमा दरम्यान एखाद्या रुग्णाचा रुग्णालयात जाताना किंवा या परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास मदतीआभवी जर एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? याची माहिती या दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर येऊन शहरासह तालुक्यातील जनतेला द्यावी अशी अपेक्षा देखील सर्वसामान्य जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरीतील खलाशाचं मुंडक कापून बोटीवर ठेवलं, बोटीला लावली आग, मृत खलाशी गुहागरमधील

मानसिक संतुलन बिघडलेल्या खलाशाने चक्क तांडेलचे डोके कापून बोट पेटवून दिल्याची धक्कादायक घटना देवगड समुद्रात सोमवारी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण कोकणात एकच खळबळ उडाली आहे. कोस्टगार्डच्या मदतीने बाकीच्या खलाशांना वाचविण्यात यश आले आहे. सिंधुदुर्गातील देवगडच्या समुद्रात रत्नागिरीतील खलाशाचा खून केल्याची घटना सोमवार 28 रोजी दुपारी घडली. झारखंड येथील निर्दयी खालाशाने रत्नागिरी गुहागर येथील खालाचे मुंडके कापले त्यानंतर त्याने रागाच्या भरात बोटीलाच आग लावून दिल्याने भर समुद्रात बोटीचा थरार अंगावर काटा आणणारा होता. या धक्कादायक प्रकाराने रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रवींद्र नाटेकर गुहागर असे ठार झालेल्या या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खोल समुद्रात मासेमारी करिता गेलेल्या नौकेवरील खलाशी व तांडेल यांचेमध्ये आपापसात झालेला वाद विकोपाला जाऊन नौकेवरील तांडेलचा खून करून नौका पेटवल्याची घटना कुणकेश्वर पासून खोल समुद्रात १५ वावाच्या अंतरावर दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली असून बोटीचे सुमारे दीड कोटीचे नुकसान झाल्याचे समजते.

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील संशयित आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा राहणारा छत्तीसगड हा मानसिक रुग्ण असल्याचे समजते. ते नौकेवरील तांडेलाचा खून करून नौकेला आग लागल्यानंतर नौकेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या छोट्या होडीत जाऊन बसला.दरम्यान घटनास्थळी गस्तीनौकेने गेलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. व देवगड येथे देवगड बंदरात आणले व त्याला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की रत्नागिरी येथील राजीवाडा येथील नुमान रफिक फणसोफकर यांच्या मालकीची नुझत राबिया ही नौका रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिरकर वाडा येथून मासेमारी करिता निघाली होती.सोमवारी कुणकेश्वर येथे खोल समुद्रात मच्छीमारी करताना खलाशी व तांडेल यांच्यात वाद झाला.हा वाद विकोपाला गेल्यानंतर नौकेवरील खलाशी जयप्रकाश विश्वकर्मा यांनी तांडेल रवींद्र नाटेकर राहणारा गुहागर याचा खून करून नौका पेटवून दिली. विश्वकर्मा याने नौका पेटविल्यानंतर नौकेमागील असलेल्या छोट्या होडीत जाऊन बसला.नौकेने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच व नौकेवरील खलाशांनी जीवाच्या आकांताने केलेली आरडाओरड ऐकून नजीकच्या नौकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा व नौकेवरील खलाशांना वाचविण्याचा प्रयत्न केला. या नौकेवरील तांडेल धरून एकूण २६ खलाशी होते.
याबाबतची माहिती मत्स्य व्यवसाय अधिकारी पोलीस प्रशासन यांना देण्यात आली .त्यानुसार मत्स्य व्यवसाय अधिकारी पार्थ तावडे यांनी देवगड बंदर येथे येऊन सागर पोलीस शाखेस माहिती दिली. सागर पोलीस शाखेच्या गस्तीनौकेने तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन देवगड बंदरात आणले.

©️2024 Times Marathi News, Media Network
Editor – Rakesh Koli
Rg.No.MH-28-0054845
Khed, Ratnagiri

ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा

🪀 व्हाट्सअप ग्रुप लिंक
https://chat.whatsapp.com/CEeDRKqaMDTBB15bt7AuLg

👤 फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/share/D44NdYnfuQVHqqY9/?mibextid=qi2Omg

🌀 इंस्टाग्राम लिंक
https://www.instagram.com/rakesh0946?igsh=emZodDkzc25peWVm

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
👉🏻 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक  8390380101

बोरज येथे 2 ट्रकच्या समोर समोर धडकेत 1 ठार

अधिक माहिती साठी पुढील लिंक वर क्लिक करा https://bit.ly/3uh64MC