खेडमध्ये जेसी आणि लायन्सचा वाद चव्हाट्यावर,लायन्स कडून जेसीआय ला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

एकाच वेळी दोन्ही संस्थांचे समोरासमोर कार्यक्रम

राकेश कोळी –

खेड सारख्या अधूनिक शहरात जिथे लहान मुलांच्या मनोरंजना साठी साधा बगीचा उपलब्ध नसलेल्या शहरात होणारे फेस्टिवल हेच केवळ शहरवासीयांच्या मनोरंजनाचे साधन शिल्लक राहिले आहे. यापूर्वी शहरात केवळ जेसीआय खेड यांच्याकडून जेसी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत होते. मात्र सन 2024  जानेवारीमध्ये लायन्स फेस्टिव्हलचे देखील लायन्स या सामाजिक संस्थेकडून आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहरवासीयांना ह्या वर्षी दोन वेगवेगळ्या फेस्टिवलच्या माध्यमातून मनोरंजनाचा लाभ घेता आला होता. मात्र या दोन संस्थेमध्ये डिसेंबर 2023 मध्ये बॅनर लावण्याच्या शुल्लक कारणावरून वाद झाल्याचे शहरवासीयांनी पाहिले होते. त्यावेळे पासून या दोन्ही संस्था एकमेकांसोबत स्पर्धा करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबतचे वृत्त देखील टाईम्स मराठी न्यूज ने प्रसिद्ध केले होते. मात्र यंदा आयोजित करण्यात येत असलेल्या फेस्टिवल दरम्यान या दोन संस्थांमध्ये आता जोरदार स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यावेळी दोन्ही संस्थांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले असले तरी दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी होणार असल्याने यांच्यातील स्पर्धा किंवा वाद आता जगजाहीर झाला असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण शहरात गेल्या वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून खेड लायन्सचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी लायन्स संघटनेचे महत्त्व वाढवले होते. या उपक्रमातून त्यांना चांगली प्रसिद्धी आणि नावलौकिक देखील प्राप्त झाले होते. मात्र यंदा होणाऱ्या जेसी फेस्टिवल वेळी त्यांनी आपल्या क्रीडा मोहत्सवाचे आयोजन करून त्यांनी जेसी सोबत स्पर्धा करीत असल्याचे दाखवून दिले. खरेतर दोन्ही संघटनेने काल गुरुवार 26 डिसेंबर रोजी सायंकाळी विविध माध्यमातून आपले कार्यक्रम जाहीर केले.

लायन्स क्लब पत्रकार परिषद
जेसीआय खेड पत्रकार परिषद

यामध्ये जेसीसने आपल्या फेस्टिवल कार्यालयाचे उद्घाटन करून तर लायन्सने पत्रकार परिषद घेवून क्रीडा मोहत्सव जाहीर केला. मात्र जेसीस या सामाजिक संस्थेने खेड शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी करून आपल्या तारखा यापूर्वीच म्हणजे 17 डिसेंबरला जाहीर केल्या होत्या. तर लायन्सने 26 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेवून आपल्या तारखा जाहीर केल्या. हा वाद एवढ्या पुरता मर्यादित न राहता दोन्ही संघटनांनी आपले कार्यक्रम शहरातील एकच मैदानावर घेतल्याने यांच्यातील स्पर्धा आता टोकाला पोहचल्याचे पहावयास मिळत आहे. खरेतर शहरतील महाड नाका येथील एस टी डेपोचे ग्राउंड म्हणजे गोळीबार मैदान म्हणून परिचित असणाऱ्या मैदानात हे फेस्टिवल आयोजित केले जातात. तर त्या बाजूलाच असणाऱ्या क्रीडा संकुलाच्या जागेत फेस्टीवलसाठी येणारे नागरिक आपली वाहने पार्किंग करीत असतात. फेस्टिवलच्या कालावधीत नेहमी अंधारात असलेले हे मैदान मात्र झगमगुन उठते. मात्र यंदा सर्वात आधी जेसी फेस्टिवलने आपल्या कार्यक्रमाची तारीख जाहीर केली असताना देखील लायन्सने आपला क्रीडा मोहत्सव याच दरम्यान जाहीर केला. एवढ्यावरच न  थांबता जेसी फेस्टिवल होणाऱ्या ग्राउंड समोरील क्रीडा संकुलाचे ग्राऊंडवर ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली. खरेतर या क्रीडा संकुलाच्या मैदानाचा वापर गेले अनेक वर्षे जेसीआय ने फेस्टीवलसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंग केला होता. इतकेच नव्हे तर 2024 मध्ये पार पडलेल्या लायन्स मोहत्सवामध्ये देखील याच जागेचा वापर वाहन पार्किंग साठी करण्यात आला होता. मात्र आता ही जागा क्रीडा मोहत्सवास घेवून एकप्रकारे लायन्सने जेसीआय खेडची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे पहावयास मिळत आहे.

याबाबत दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यां कडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही संघटनेने आपले कार्यक्रम हे पूर्व नियोजित असल्याचे स्पष्टपणे सांगितले. तर खेड जेसिस फेस्टिवल देखील पूर्व नियोजित असून 5 ऑक्टोंबर रोजी सर्व प्रथम फेस्टिवलच्या तारखांची माहिती शहरातील व्हॉट्स ऍप या सोशल मीडियावर जाहीर केल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर लायन्सच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपले वर्षभरातील कार्यक्रम जुलै मध्ये शेड्युल्ड केल्याचे सांगितले. सर्व प्रथम आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लायन्स मिसळ फेस्टिव्हलचे आयोजन केल्याचे सांगत असताना त्यांनी जेसी फेस्टिव्हलची तारीख जाहीर झाल्याने आपला मिसळ फेस्टिवल रद्द करून मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या जेसी फेस्टीवलसाठी आम्ही एक पाऊल मागे घेवून आमचा मिसळ फेस्टिवल रद्द केल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना आठवणीने सांगितले. तर यावेळी बोलताना दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संघटनेची नावे देखील आपल्या तोडत घेणे टाळल्याचे पहावयास मिळत होते. तसेच दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आमच्या कोणतेही मतभेद नसून आमच्यात सलोखा आहे हेही त्यांनी आवर्जुन सांगितले. माञ बोलणे आणि कृती यातून त्यांच्यातील मतभेद हे स्पष्ट पणे जाणवत होते. यावेळी या दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना एकमेकांशी चर्चा करून हे कार्यक्रम रिषेड्युल्ड करता येतात का पाहा असे सांगताच त्यांनी मात्र आता आमचे नियोजन पूर्ण झाले असून आता कार्यक्रम आम्ही रिषेड्युल्ड करू शकत नसल्याचे देखील सांगितले. मात्र मिसळ मोहत्सव्
रिश्येड्युल्ड होता तर क्रीडा मोहत्त्सव कुठून आला. जर लायन्स ने एक पाऊल मागे घेवून मिसळ मोहत्सव रद्द केला तर मग क्रीडा मोहत्सव का? असा प्रश्न देखील या निमित्त उपस्थित होत आहे. यावेळी दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून ठीक आहे आम्ही विचार करतो काही करता येते का ते पाहतो असे सांगण्याचे  साधे औपचारिकता देखील न दाखवल्याने यांच्यातील स्पर्धा, संघर्ष किंवा वाद याच्यावर शिक्कामोर्तब होतो हे मात्र निश्चित.


या दोन्ही संघटनेतील वादामुळे किंवा अपापसातल्या स्पर्धेमुळे नुकसान मात्र या दोन्ही संघटनेचे व तालुका वसियांचे होणार हे मात्र निश्चित. कारण हे दोन्ही कार्यक्रम एकच वेळी आयोजित केल्याने क्रीडा वासियांना व तालुकावासियांना एकावेळी एकच कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. क्रीडाप्रेमी आपल्या कुटुंबासह फेस्टीवलला भेट देतील की क्रीडा स्पर्धांचा आनंद घेतील हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडल्यावाचून राहणार नाही. तर हे दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केल्याने कार्यक्रमंना येणारे पब्लिक देखील विभागले जाण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. यांच्या आपसातील स्पर्धेमुळे उत्कृष्ठ काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या नावाला देखील हानी पोहचण्याची शक्यता असल्याचे सध्या चर्चिले जात आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांनी एकमेकांशी पुन्हा समन्वय साधून आपल्या कार्यक्रमाच्या तारखा ऍडजस्ट होतात का हे पाहावे जेणेकरून तालुकावासियांना या दोन्ही कार्यक्रमाचा लाभ घेता येईल असे मत सध्या शहरातील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

©️2024 Times Marathi News, Media Network

Editor – Rakesh Koli

Rg.No.MH-28-0054845

Khed, Ratnagiri 

ताज्या बातम्या आणि घडामोडींची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा 

खेड उबाठा शहराध्यक्षांचा राजीनामा, शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश

Breaking News

खेड शहर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष दर्शन अजित महाजन यांनी मंगळवारी सकाळी अचानक आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून मंगळवारीच ते शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळत आहे. उबाठा गटाच्या शहराध्यक्षांनी अचानक राजीनामा देवून घेतलेल्या निर्णयामुळे खेड तालुक्यातील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आणि जिल्हाप्रमुख सांजयराव कदम यांना मोठा धक्का बसला आहे. एक आक्रमक तरुण नेतृत्व, चांगले वक्ते यांच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गटाने गमावले असून त्याचा फायदा आता शिवसेना शिंदे पक्षाला होणार आहे. शहराध्यक्ष म्हणून काम करीत असताना दर्शन महाजन यांनी अनेक आंदोलने आणि उपोषणे करून प्रशासनाचे लक्ष वेधून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या राजीनाम्याने उबाठा पक्षाला खेड शहरात मोठा धक्का बसला असून आगामी विधान परिषद निवडणुकीत याचा फायाड शिवसेना पक्षाला व आ. योगेश कदम यांना मात्र नक्की होईल.

दापोली शिवसेनेत 70 पेक्षा अधिक जणांचा आम. योगेश कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

दापोली शहरातील खोंडा प्रभाग क्रमांक 4 व अहमदनगर प्रभाग क्रमांक 2 येथील जवळपास 70 हून अधिक नागरिकांनी आज दापोली खेडचे आमदार योगेश दादा कदम यांच्या विकासकामांवर प्रेरित होऊन आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्व पक्ष प्रवेशकर्त्यांचे शिवसेना पक्षात आमदार योगेश दादा कदम यांनी स्वागत केले. दापोली येथील शहर शिवसेनेच्या शाखेमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

यावेळी माजी समाजकल्याण सभापती भगवान घाटगे, तालुकाप्रमुख उन्मेषा राजे, माजी नगराध्यक्ष व माजी शहरप्रमुख राजेंद्र पेटकर, विधानसभा क्षेत्र संघटक प्रदीप सुर्वे, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, महिला आघाडी शहर संघटिका रसिका पेटकर, माजी नगराध्यक्ष परवीन शेख, माजी नगरसेविका शबनम मुकादम, नगरसेविका रूपा घाग, प्रीती शिर्के, शिवानी खानविलकर, शहरप्रमुख प्रसाद रेलेकर, युवा सेना शहर अधिकारी स्वप्नील पारकर, माजी सभापती ममता शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहिणी दळवी, कोकण कृषी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य सुनील दळवी, युवासेना उपजिल्हाधिकारी अमित पार्दुले, युवासेना सचिव किरण बांद्रे, माजी शहरप्रमुख सुहास खानविलकर, उप तालुकाप्रमुख चंद्रकांत कामथेकर, शहर समन्वयक प्रकाश साळवी, अल्पसंख्याक शहरप्रमुख नदीम मुकादम, जावेद भाई सारंग, दीपक सूर्यवंशी, शशांक घाग, राजू बोथरे, युवती शहर अधिकारी कीर्ती परांजपे, माजी समाजकल्याण सभापती चारुता कामठेकर आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आमदार योगेश कदम यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले व पक्षात त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार योगेश कदम यांनी दापोली शहरातील विकासकामांवर भाष्य करताना नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी आपल्या उमेदवारांना दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच आज ज्या नागरिकांनी आपल्या पक्षात प्रवेश केला आहे त्यांना कधीही विकासकामांची कमतरता भासू देणार नाही असा शब्द दिला. दापोली शहरातील प्रत्येक विकासकाम करण्याची धमक आमदार योगेश कदम यांच्यामध्ये आहे हा विश्वास जनतेने दाखवला आहे आणि हा विश्वास आमदार म्हणून मी नक्कीच सार्थ ठरवेन असे आश्वासन आमदार योगेश कदम यांनी उपस्थिताना केले. सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उध्दव ठाकरे यांच्या अज्ञानाचा पराभव – आम. योगेश कदम

उध्दव ठाकरे यांना त्यांच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांमुळे पक्ष घटना कधी समजली नाही किंवा त्यांच्या अज्ञानाने त्यांनी कधी समजूनच घेतली नाही. आज त्यांच्या अड्यानांमुळेच त्यांचा पराभव झाला असल्याचे मत खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेश रामदास कदम यांनी X या सोशल मीडियावर ट्विट करत व खेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

आमदार योगेश कदम यांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा करताना खेड भाजप चे शहराध्यक्ष अनिकेत कानडे

आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी 1999 साली जी पक्ष घटना पक्षाला दिली होती. तीच पक्ष घटना ग्राह्य धरून आजची सुनावणी करण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या अज्ञानामुळे किंवा त्यांच्या आजू बाजूला असलेल्या भडव्यांमुळे पक्ष घटना त्यांना कधी समजलीच नाही. अज्ञानी बनून पक्ष चालवल्यामुळे किंवा आजूबाजूच्या अकार्यक्षम बडव्यांवर विश्वास ठेवल्याने त्यांचा आज पराभव झाल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले. या सुनावणी दरम्यान माझे मत मांडताना मी खूप जबाबदारीने बोललो होतो. उध्दवजींनी पक्षप्रमुख काम करताना स्वतःच्या पक्षाची घटना जर ते निवडणूक आयोगाकडे रजिस्टर करू शकले नसतील तर त्यांच्या ह्या घोडचुकीमुळे त्यांना हा आजचा पराभव स्वीकारावा लागला असल्याचे मत आमदार योगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी ज्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती त्याचाच हा विजय असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.